Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Heavy rains: अतिवृष्टी, पूरस्थिती अन् मृत्यू…:मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश

एका तालुक्याचे रिपोर्ट येताच शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली जाईल. ज्या ठिकाणी मृत्यूंची नोंद झाली आहे. त्याठिकाणीही जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे अधिकार देण्यात आले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 23, 2025 | 04:47 PM
Maharashtra Heavy rains: अतिवृष्टी, पूरस्थिती अन् मृत्यू…:मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश
Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्रात अतिवृष्टीचा तडाखा
  • देवेंद्र फडणवीस यांनी या पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली
  • एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्यांचे  मदत कार्य सुरू
Devendra Fadnavis on Maharashtra Heavy rains: मराठवाड्यासह राज्यभरात अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. बीड, मराठवाडा, अहिल्यानगर आणि इतर अनेक जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला आहे. ज्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील या पूरपरिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या नुकसानाला सामोरे जात आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकले आहेत. प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधींची चार राज्यांमध्ये नवी रणनीती; काँग्रेसची बूथ रक्षक योजना काय आहे? पायलट प्रोजेक्ट सुरू

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्यांतील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना आणि मंत्र्यांना सूचित केले आहे की उद्याही पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थिती पाहावी. मी स्वतः काही भागांना भेट देणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सांगितले की, अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागात अतिवृष्टी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या दुर्घटनेत सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत.

राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या इतका पाऊस पडला आहे की तो सरासरीपेक्षा १०२ टक्के अधिक आहे. काही भागांमध्ये पूरामुळे लोक अडकले आहेत. बीडमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे, तर धाराशिवमध्ये एनडीआरएफच्या मदतीने २७ लोकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. यासोबतच २०० नागरिकांना वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले आले आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री तिथे पोहोचले असून त्यांनी अतिरिक्त हेलिकॉप्टरची मागणी केली आहे आणि त्यासाठी मीही प्रयत्न करत आहे.

विशेषत: सोलापूर,जळगाव,अहिल्यानगर, बीडसह परभणी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. यात सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. आत एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या त्या भागात मदत कार्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचे नुकसान पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते, आणि जे पंचनामे तयार होतील, तशी मदत दिली जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकूण २,२१५ कोटी रुपयांचा जीआर काढण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

चप्पलने मारले, संपूर्ण हॉस्टेलमध्ये निर्वस्त्र फिरवले अन्…; कॉलेजच्या विद्यार्थ्यासोबत भयानक Ragging

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूरग्रस्त भागांना मदत देण्यासाठी १,८२९ कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमा केले गेले आहेत. पुढच्या ८–१० दिवसांत हे पैसे संपूर्णपणे वितरीत केले जातील. पावसामुळे काही ठिकाणी काम थांबलेले नाही आणि नवनवीन ठिकाणी पाऊस पडत असल्याने पंचनामे व मदत कार्य सातत्याने सुरु राहणार आहे.

तसेच, एका तालुक्याचे रिपोर्ट येताच शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली जाईल. ज्या ठिकाणी मृत्यूंची नोंद झाली आहे. त्याठिकाणीही जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या लोकांना मदत मिळेल, अशी हमी देण्यात आली आहे.

 

Web Title: Heavy rains floods and deaths important orders of cm fadnavis in the cabinet meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 04:47 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra rain news

संबंधित बातम्या

Thackeray Brothers Alliance :”माझ्याकडे यांचे असंख्य व्हिडिओ आहेत..! राज ठाकरे करणार महायुतीची पोलखोल?
1

Thackeray Brothers Alliance :”माझ्याकडे यांचे असंख्य व्हिडिओ आहेत..! राज ठाकरे करणार महायुतीची पोलखोल?

Namokar Tirth : णमोकार तीर्थ विकासासाठी 36 कोटींच्या आराखड्याला मान्यता, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
2

Namokar Tirth : णमोकार तीर्थ विकासासाठी 36 कोटींच्या आराखड्याला मान्यता, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Purandar Airport: “पुरंदर विमानतळावर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणार”, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
3

Purandar Airport: “पुरंदर विमानतळावर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणार”, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.