
कल्याण- अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात, टॅक्सीला सिमेंट मिक्सरची जोरदार धडक, 8 जणांचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेले सर्वजण मुरबाड येथील रहिवासी असून ते कल्याणहून मुरबाडकडे जात होते. दरम्यान, संबंधित पुलावर सध्या एकमार्गी वाहतूक सुरू असल्याने वाहनांची गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर हा भीषण अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. पूल पूर्णपणे सुरक्षित नसतानाही घाईघाईत सुरू करण्यात आल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
तसेच, अपघातग्रस्त इको टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे जीवितहानी अधिक झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलिस आणि बचाव पथकांनी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे
पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने तात्काळ हटवून वाहतूक सुरक्षा सुनिश्चित केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर, ८ जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. अपघात नेमका का झाला? याचा तपास सुरु आहे.
बबलू चंदने
जिजा केंबरी
गणपत चंदे
अनंत पवार
भुषण घोरपडे
Satara News : विनापरवाना खैर लाकूड तस्करीवर महाबळेश्वर वन विभागाचा घाव; दोन जण ताब्यात
इको कार आणि सिमेंट मिस्करची समोरासमोर भयंकर धडक झाली होती. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला. तसेच अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. रायची पूलवार नव्याने उभारलेल्या ब्रिजवर सिमेंट मिक्सर आणि काळीपिवळी इको कारची जोरदार धडक झाली. इको कारने सिमेंट मिस्करला जोरदार धडक दिली. इको कार कल्याणहून मुरबाडला स्थलांतरितांची वाहतूक करतात. त्याच वेळी पूर्वी इको कारने समोरून मिस्करलाला धडक दिली. टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक माहितीनुसार, ८ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
रक्तपेढ्यांचे खासगीकरण करण्याला तीव्र विरोध! सरकारला निवेदन देऊन निर्णय रद्द करण्याचे आवाहन