Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut: तोपर्यंत देशात स्पष्ट आणि स्वच्छ निवडणुका होणार नाहीत…; प्रभागरचनेवरून संजय राऊतांची आगपाखड

एकीकडे मोदी सरकार म्हणते की पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही. सिंधू नदीचं पाणी अडवतो, पाकिस्तानविरोधात युद्ध सुरू आहे, असं सांगतात आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला हिरवा कंदील दाखवतात. हा निर्लज्जपणा आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 23, 2025 | 01:06 PM
Sanjay Raut: तोपर्यंत देशात स्पष्ट आणि स्वच्छ निवडणुका होणार नाहीत…; प्रभागरचनेवरून संजय राऊतांची आगपाखड
Follow Us
Close
Follow Us:

Sanjay Raut Criticized Modi-Shah:  ” जर खासदार राहुल गांधींना (Rahul Gandhi)  निवडणूक आयोगाने केलेल्या मतचोरीविरोधात यात्रा काढावी लागली, तर महापालिका निवडणुकांमध्ये आपल्या सोयीच्या प्रभाग रचना कराव्यात यासाठी हा मिंध्ये गट, भाजप किंवा इतर लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. जोपर्यंत या देशात मोदी, शहां सारखे लोक सत्तेवर आहेत तोपर्यंत या देशात निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणात कधीच होणार नाहीत,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, मुंबई महानगरपालिका असो विधानसभा किंवा लोकसभा असो कारण इतकेच सांगेल की पैशाचा प्रचंड वापर आणि सत्तेचा गैरवापर यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी हे कोणत्याही थराला जातील, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला आहे.

ऑपरेशन सिंदूर सुरू असताना केंद्र सरकारने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना परवानगी दिल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, “एकीकडे मोदी सरकार म्हणते की पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही. सिंधू नदीचं पाणी अडवतो, पाकिस्तानविरोधात युद्ध सुरू आहे, असं सांगतात आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला हिरवा कंदील दाखवतात. हा निर्लज्जपणा आहे.”

“ पण जर देशात दुसरे कुणाचे सरकार असते आणि त्यांनी हा जर निर्णय घेतला असता तर या लोकांनी संपूर्ण देशभरामध्ये एक आंदोलन उभं केलं असतं, पण प्रधानमंत्री यांनी शांतपणे पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही असं पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री म्हणत आहेत, मग ऑपरेशन सिंदूर संपलेले नसताना ज्या देशाविरुद्ध तुम्ही युद्ध पुकारलेल आहे त्या देशाबरोबर क्रिकेट का खेळायचं आहे, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Air India : उड्डाणच्या तयारीत अन् अचानक लँडिंग; एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड 

“पहलगाममध्ये जवानांचे रक्त सुकलेलं नाही, कुटुंबीयांचे अश्रू आटलेले नाहीत. अशा वेळी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय म्हणजे शहीदांचा अपमान आहे.या देशातले लोक तिकडे मॅच बघायला जाणार. गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा ते दुबईत भारत-पाक सामन्याला ऐटीत बसणार आणि भारताच्या जनतेने पाकिस्तान विरुद्ध नारे द्यायचे, सैनिकांनी हुतात्म्य पत्करायचं, जनतेने प्राण गमवायचे आणि हे पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे ट्रेड करणार, असा खडा सवालही राऊतांनी उपस्थित केला. तसेच,हा अत्यंत धक्कादायक आणि बेशरमपणाचा प्रकार आहे, आम्ही त्याचा निषेध केलेला आहे, उद्धव ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना, आदित्य ठाकरे यांनी सुद्धा त्यांचं स्पष्ट आणि परखड मत मांडलं असल्याचे संजय राऊतांनी सांगितले.

जर हा निर्णय दुसऱ्या सरकारने घेतला असता तर भाजपने देशभर आंदोलन पेटवले असते. पण आज मात्र जय शहा (अमित शहांचे सुपुत्र) दुबईत ऐटीत बसून सामना पाहणार आणि भारतीय जनता नारे देणार, सैनिक प्राण देणार. हा प्रकार आम्ही देशद्रोह मानतो. हेच सामने महाराष्ट्रात किंवा दिल्लीत झाले असते तर शिवसेनेने ते उधळून लावले असते. आम्ही ढोंगी नाही. आमचं हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व पक्कं आहे.”

Pune Municipal Corporation Election 2025: पुणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! नवी प्रभागरचना

काँग्रेसनेही याबाबत ठाम भूमिका घेतल्याचे राऊत म्हणाले. मात्र शरद पवार यांच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले, हा प्रश्न क्रिकेटचा नसून भारत-पाकिस्तान युद्धाचा आहे. पाकिस्तानचे व्हिसा बंद, त्यांच्या नागरिकांना बाहेर पाठवणं, व्यापार थांबवणं आणि एकीकडे क्रिकेट खेळणं हा दुटप्पीपणा आहे. भारत-पाक सामने म्हणजे हजारो कोटींचा सट्टा, विशेषतः गुजरात-राजस्थानमध्ये. हे सर्व भाजप समर्थकांचे फायदे बघून निर्णय घेतले जातात. जय शहा क्रिकेटचे सूत्रधार आहेत आणि त्यांच्या वडिलांकडे गृहमंत्रिपद आहे. अशा वेळी राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि यांनी मात्र पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचं — हे देशभक्ती नसून देशद्रोह आहे.” अशी सणसणीत टीकाही त्यांनी यावेळी केली.

“क्रिकेट खेळाडूंना राष्ट्रीय भावना नाहीत का? असतील तर मैदानात उतरू नका. पण ते जातील कारण त्यांच्यावर मोदी-शहा यांचा दबाव आहे. हा गंभीर विषय आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही यावर चर्चा करू. दुबईतील सामन्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू शकतात.” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

 

Web Title: Sanjay raut criticizes modi shah government on issues of ward formation india pakistan cricket match election commission vote rigging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 01:06 PM

Topics:  

  • sanjay raut

संबंधित बातम्या

“फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये…; उपराष्ट्रपती पदासाठी फोन केल्यामुळे खासदार राऊतांचे टीकास्त्र
1

“फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये…; उपराष्ट्रपती पदासाठी फोन केल्यामुळे खासदार राऊतांचे टीकास्त्र

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले
2

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
4

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.