
दादर-गोरखपूर रेल्वेच्या निर्णयाचा तीव्र निषेध; मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीबाबत मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण
Dadar-Gorakhpur Train: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (२४ मार्च) मध्य रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रतिक गोस्वामी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दादर-रत्नागिरी रेल्वे पॅसेंजर सेवा रद्द करून तिच्या ऐवजी दादर-गोरखपूर रेल्वे सुरू करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. यावर मध्य रेल्वेकडून कोकणात जाण्यासाठी सध्या एकूण २१ गाड्या प्रतिदिवशी चालवल्या जातात. यापैकी ६ गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ८ गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस, १ गाडी दादर, ४ गाड्या कल्याण व २ गाड्य दिवा स्थानकावरून चालवल्या असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी कोरोना नंतर पुन्हा सुरू करण्यात. मात्र, तेव्हा २०२१ मध्ये ही गाडी दिवा स्थानकामध्ये शिफ्ट करण्यात आली. याचे मुख्य कारण दिवा स्थानकामध्ये क्रॉसिंग करत असताना इतर लोकल ट्रेनला होणारा उशीर हे होते. ही गाडी ज्यावेळेस दिवा स्थानकामध्ये क्रॉसिंग करते, त्यावेळेस साधारणपणे ७ ते ८ लोकल गाड्यांना थांबावे लागत होते.
कोणताही बदल नाही तर, लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरून गोरखपुरला जाणारी गाडी दादर स्थानकामधून ऑगस्ट २०२२ पासून चालू करण्यात आली. लोकमान्य टिळक टर्मिनसला एलएचबी कोचेसचा मुख्य डेपो बनवल्यानंतर या गाडीला दादर स्थानकामध्ये स्थलांतरित करण्यात आले. यावेळी या गाडीच्या कोचची संख्यादेखील २२ वरून १७ करावी लागली होती. ही गाडी २०२२ पासून आतापर्यंत सातत्याने दादर स्थानकावरून चालवण्यात येत आहे. आता या गाडीच्या संचालनामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही.
मध्य रेल्वेकडून कोकणात जाण्यासाठी सध्या एकूण २१ गाड्या प्रतिदिवशी चालवल्या जातात. यापैकी ६ गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ८ गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस, १ गाडी दादर, ४ गाड्या कल्याण व २ गाड्य दिवा स्थानकावरून चालवल्या जातात. तर, २५ गाड्या वसई रोड येथून पनवेल मार्गे कोंकण रेल्वेसाठी चालवल्या जातात. अशा एकूण ४६ गाड्या दररोज कोकणात जाण्यासाठी उपलब्ध आहेत. शिवाय आवश्यकतेनुसार विशेष गाड्या देखील कोंकण रेल्वेसाठी चालविल्या जातात. मागच्या वर्षी गणेशोत्सवासाठी ३०२ विशेष गाड्या मध्य रेल्वेने चालवल्या होत्या.
५२ उन्हाळी विशेष गाड्या व ३६ होळी विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या.