
मुंबई पोलिसांच्या व्हॅनसमोर एकटी दटून राहिली रिया अहिर... तरुणीच्या हिमतीची होतेय सर्वत्र चर्चा; नक्की आहे तरी कोण?
तानसा,विहार, तुळशी तलाव तुडुंब भरले. तलावांत एकूण ६१.९० टक्के जलसाठा
पोलिसांची व्हॅन अडवणारी मुलगी आहे कोण?
मुंबईमध्ये पोलिस व्हॅन अडवणाऱ्या मुलीचे नाव आहे रिया यादव. रिया एका अभिनेत्री, माॅडल आणि उद्योजक आहे. रिया सामाजिक आणि राजकीय विषयांवर उघडपणे आपले मत मांडते. एक उद्योजिका म्हणून, ती हाताने कपडे शिवते. तिचा ‘रियासत’ नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे. रियाला नृत्याचीही आवड आहे. तिने अनेक म्यूजिक व्हिडिओमध्येही काम केले आहे ज्यात अलीकडील ‘दिलबरा’ या गाण्याचा समावेश आहे.
स्वभावाने रिया धार्मिक असून तिचा देवावर फार श्रद्धा आहे. ती दररोज मंदिरांमध्ये जाऊन देवाची पूजा-अर्चा करते. रिया मागील काही काळापासून इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. विद्यार्थ्यांच्या विरोध प्रदर्शनादरम्यान रियाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच लक्षवेधी ठरला. यात ती पोलिसांसमोर निडर होऊन त्यांची व्हॅन अडवताना दिसून आली. रियाने एकटीनेच पोलिसांना व्हॅन पुढे नेण्यापासून रोखून ठेवले.
पोलिस व्हॅनसमोर उभी राहिली
बुधवारी शिवाजी पार्कमध्ये होत असलेल्या आंदोलनात रिया प्रमुख चेहरा ठरली. रिया दादरमधील कोहिनूर चौकातून शिवाजी पार्ककडे चालत जात असताना तिला ताब्यात घेतलेल्या आंदोलकांनी भरलेली एक पोलीस व्हॅन दिसली. ती लगेच व्हॅनच्या दिशेने वळली आणि व्हॅनचा रस्ता अडवत समोर जाऊन उभी राहिली. इतकंच नाही तर व्हॅनच्या जवळ जाऊन तिने एका हाताने व्हॅनला पुढे जाण्यापासून रोखून धरले. वृत्तानुसार, पोलिसांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थ्यांना नंतर सोडून देऊ असेही त्यांनी म्हटले पण शेवटपर्यंत रिया हटण्यास तयार झाली नाही. अखेरीस, रियाच्या प्रयत्नांना यश आले आणि पोलिसांनी सर्व आंदोलकांना व्हॅनमधून सोडून दिले.
Meet Rhiya Ahir [IG: rhiyaahir]👏 One fearless young woman stood in front of a police van during the Mumbai student protests, refusing to back down. Courage can’t be bought. Justice can’t be silenced. Salute to her. 🫡🫡 pic.twitter.com/c9oAvhQPeq — زماں (@Delhiite_) July 22, 2026
रियाने आरोप लावला की, पोलिस आपले काम जबाबदारीने करत नाहीयेत. जर ते आपली जबाबदारी नीट पार पाडत नसतील तर आपणच स्वतःच आपल्या नागरिकांची जबाबदारी घेतली पाहिजे. रियाने मिडियाला सांगितले की, ती दलित नाही, ओबीसी नाही, तिचे वडिल शेतकरी आहेत. तिने विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवला कारण पोलिस त्यांना विनाकारण मारहाण करत होते. यासोबतच आपल्या संस्कृतीचा आणि समाजाचा तिला अभिमान असल्याचेही तिने मिडियाला सांगितले.