Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अर्थ अवर’ पाळण्यास मुंबईकर निरुत्साही! पर्यावरण विषयावर प्रचंड खल, चर्चेचे ठोस कृतीत रूपांतर होईना

२००७ पासून सुरू झालेल्या 'अर्थ अवर' या जागतिक उपक्रमाचे यंदा २०वे वर्ष असून मात्र प्रतीकात्मक 'एक तास अंधार पाळण्याचीही तयारी कमी होत असेल, तर पर्यावरण संवर्धनाच्या मोठ्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहणे अपरिहार्य ठरत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 29, 2026 | 11:40 AM
'अर्थ अवर' पाळण्यास मुंबईकर निरुत्साही! पर्यावरण विषयावर प्रचंड खल, चर्चेचे ठोस कृतीत रूपांतर होईना

'अर्थ अवर' पाळण्यास मुंबईकर निरुत्साही! पर्यावरण विषयावर प्रचंड खल, चर्चेचे ठोस कृतीत रूपांतर होईना

Follow Us
Close
Follow Us:

हवामान बदल, पर्यावरण संवर्धन आणि ऊर्जा बचतीवर मोठमोठ्या चर्चा करणारे प्रत्यक्ष कृतीच्या वेळी मात्र मागे पडत आहेत का, असा सवाल यंदाच्या ‘अर्थ अवर’च्या निमित्ताने उपस्थित झाला आहे. पर्यावरण आणि हवामान बदला बाबत जागरूकता करण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ‘लाईट बंद’ करून जगभरात अर्थ अवर साजरा केला जातो. या साध्या प्रतीकात्मक कृतीतही शहराचा उत्साह ओसरल्याचे चित्र दिसत असून, पर्यावरणाबाबतचा जागरूकतेचा गजर केवळ सोशल मीडियापुरताच मर्यादित राहिला आहे का, अशी टीका होत आहे. नेमके शनिवारी अर्थ अवरच्या वेळेत आयपीएल सामने सुरु असल्याने अर्थ अवर पाळण्यावर २५ टक्के फरक पडेल असा अंदाज व्यक्त होत आहे.(फोटो सौजन्य – AI)

Mumbai News : सागरी अध्ययन, क्रीडा विज्ञानात मुंबई विद्यापीठाची झेप; युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत प्रशिक्षणासाठी करार

२००७ पासून सुरू झालेल्या ‘अर्थ अवर’ या जागतिक उपक्रमाचे यंदा २०वे वर्ष असून मात्र प्रतीकात्मक ‘एक तास अंधार पाळण्याचीही तयारी कमी होत असेल, तर पर्यावरण संवर्धनाच्या मोठ्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहणे अपरिहार्य ठरत आहे. मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राकडून नेहमीप्रमाणे रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत अनावश्यक दिवे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे केंद्राचे उमेश कुमार यांनी सांगितले. मात्र यंदा या आवाहनाला कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत पर्यावरणप्रेमींमध्ये साशंकता आहे. दरम्यान, याच वेळेत सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांमुळे नागरिकांचा कल टीव्हीसमोर अधिक आणि ऊर्जा बचतीकडे कमी असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे

  • कोरोना काळानंतर अर्थ अवरबाबतचा उत्साह घटल्याची नोंद
  • सोशल मीडियावर जागरूकता; प्रत्यक्ष कृतीत मर्यादित सहभाग
  • आयपीएल सामन्यांमुळे रात्री वीज वापरात वाढ
  • पर्यावरणपूरक उपक्रमांकडे दुय्यम दृष्टी
“माघार घ्या, नाहीतर सरकारी रोष सहन करा!” इंडियन मेडिकल असोसिएशन माजी अध्यक्ष व सभासदांनी तयार केलेल्या पॅनलमधील उमेदवारांना धमकी

पर्यावरणप्रेमी नाराज

यावर पर्यावरण दक्षता मंचचे विद्याधर वालावलक यांनी यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. ‘रात्र खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांमुळे मोठ्या प्रमाणात वीजेचा अपव्यय होती. त्याचबरोबर वीज वापरातून होणारे अप्रत्यक्ष कार्बन उत्सर्जन (स्कोप २) देखील वाढते. ऊर्जा बचतीचा संदेश देताना आपणच मोठ्य प्रमाणात वीज वापरत असू, तर ही दुटप्पी भूमिक ठरते. सामने दिवसा घेण्याचा विचार व्हायला हवा असे वालावलकर यांनी सुचवले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbaikars discouraged to observe earth hour a lot of talk on environmental issues will not translate into concrete action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • air pollution news
  • Mumabi
  • Mumbai Pollution

संबंधित बातम्या

गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत ‘बोर्डिंग’ बदला, तिकीट गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेच्या नव्या सुधारणा; खऱ्या प्रवाशांना दिला
1

गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत ‘बोर्डिंग’ बदला, तिकीट गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेच्या नव्या सुधारणा; खऱ्या प्रवाशांना दिला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.