
फोटो सौजन्य सोशल मीडिया
Nagpur : खुशखबर! दलालांशिवाय घरबसल्या मिळणार भाड्याचे घर; म्हाडाची नवी व्यवस्था नेमकी आहे तरी काय?
बाहेर आलेल्या सळ्यांमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची तसेच चारचाकी वाहनांचे टायर फुटण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी निकृष्ट दर्जाच्या संबंधित कंत्राटदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली आहे .
२०१३ मध्ये मुसळधार पावसामुळे याच ठिकाणी असलेला जुना मार्ग पाण्याखाली गेल्याने १८ जण वाहून गेले होते. सुदैवाने त्यांची वेळेत सुटका करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी २०१४ मध्ये तत्कालीन आमदार डॉ. मिलिंद माने यांच्याकडे नवीन पुलाची मागणी केली होती. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय रस्ता निधीतून या पुलाचे बांधकाम करण्यात आले आणि जुलै २०२१ मध्ये ते पूर्ण झाले. मात्र, आता या पुलाची झालेली दुरवस्था चिंतेचा विषय ठरली आहे.
AIIMS Nagpur : शस्त्रक्रियेसाठी तीन-तीन महिने वाट; रुग्णांच्या वाढल्या फेऱ्या..