मुंबई – सध्या महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यात सीमावाद पेटला आहे. तसेच यावरुन राजकारण देखील तापले आहे. कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा (Belgaum, Karwar, Nipani) एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, उलट सांगलीच्या काही गावांवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे. त्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटला असून, परिणामी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली जात आहे.
[read_also content=”…तर मग याच दिवशी दौरा निश्चित केला कसा? अजित पवारांचा राज्य सरकारला सवाल https://www.navarashtra.com/maharashtra/then-how-come-the-tour-was-fixed-on-this-day-ajit-pawar-question-to-the-state-government-351430.html”]
दरम्यान, आज पुन्हा एकदा सीमावादावरुन वातावरण तापले आहे. आज मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी इथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. मांगुर हुपरी मार्गावर, संकेश्वर हिटणी मार्गावर, गणेशवाडी कागवाड, अप्पाचीवाडी, रायबाग तालुक्यातील गायकनवाडी आणि खानापूर येथे तपासणी नाके पोलिसांनी उभारले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्र-कर्नाटक वादावर दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
सीमाप्रश्नी राज्य सरकार कमी पडत असल्याची टिका होत आहे, त्यामुळं यावर नेमकी काय भूमिका किंवा हा प्रश्न कसा मार्गी लावता येईल आदीवर शरद पवार पत्रकार परिषदेत बोलणार आहेत. सीमा बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारमधून मंत्री चंद्रकांत पाटील व मंत्री शंभूराज देसाई (Chandrakant Patil and Shambhuraj Desai) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे 6 डिसेंबरला म्हणजे आज बेळगावत जाणार होते, मात्र कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असं म्हटल्यावर या दोन मंत्र्यांनी दौरा रद्द केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा कन्नडिगांनी महाराष्ट्रातील लोकांवर हल्ला केल्यामुळं वातावरण तापले आहे.