Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jayant Patil : ‘आता बाहेर बोलायचीही चोरी’; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटील असं का म्हणाले?

जयंत पाटील यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रांची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नाराजीच्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी नाराज वगैरे काही नाही. मला आता बाहेर बोलायची चोरी झाली आहे, असं म्हटलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 14, 2025 | 04:22 PM
'आता बाहेर बोलायचीही चोरी'; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटली असं का म्हणाले?

'आता बाहेर बोलायचीही चोरी'; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटली असं का म्हणाले?

Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गेल्या काही दिवासांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांनदरम्यान दोन दिवासांपूर्वी त्यांनी आझाद मैदानावरील राजू शेट्टीच्या आंदोलनात, माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, असं विधान केलं होतं. त्याची चर्चाही राज्यभर जोरदार सुरू आहे. त्यावर आज स्वत: जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देत नाराजी व्यक्त केली आहे.

जंयत पाटील आज बारामतीत आहे. त्यांच्या नाराजीच्या चर्चेवर त्यांनी आज शरद पवारांचीही भेट घेतली. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रांची त्यांनी पाहणी केली. यावेळी पाटील यांनी नाराजीच्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी नाराज वगैरे काही नाही. मला आता बाहेर बोलायची चोरी झाली आहे. मी भाषण केलेल्याचा रेफरन्स बघा. राजू शेट्टींना बोलताना मी आंदोलनाच्या अनुषंगाने विधान केले होते, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नाही, त्यांना आम्ही उभं राहायला सांगत होतो. त्यामुळे माझं काही तुम्ही खरं धरू नका. तुम्ही तुमचे आंदोलन सुरू ठेवा, त्याला पाठिंबा आहे, अशी माझी भावना होती, असं ते म्हणाले.

नक्की काय म्हणाले होते जयंत पाटील?

शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी राजू शेट्टी यांनी आझाद मैदानावर शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. आझाद मैदानावरही त्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनाच्या ठिकाणी जयंत पाटील दोन दिवासांपूर्वी गेले होते. त्यावेळी ते म्हणाले,  यांनी जो झेंडा हाती घेतला तो कधी सोडलेला नाही. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. मात्र ‘माझी गॅरेंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही’. कारण काय तर तुम्हाला माझ्याबद्दल शंका असते. त्यामुळे तुम्हाला हमी देणं हे जरा धोक्याचं आहे. राजू शेट्टी आज खासदार राहिले असते तर लोकसभेत भाषण केलं असतं. ते झालेही असते खासदार, पण ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, ही खरी समस्या आहे, असं ते मिश्किलपणे म्हणाले होते.

काही दिवसांपर्वी जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती मिळाली होती. बावनकुळेंच्या मुंबईतील बंगल्यावर ही भेट घेतली असून यावेळी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हदेखील उपस्थित होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांसमोर नंतर खुलासा केला होता.

Web Title: Ncp sharad pawar group sate chief jayant patil reaction on rumer of joinng bjp marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • jayant patil
  • Maharashtra Politics
  • NCP Sharad Chandra Pawar Party

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान
1

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
2

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
3

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
4

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.