Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसई-विरार महापालिकेचा ३८५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची दुर्दशा! सांडपाणी खाडीत; प्रशासनाने आकारला दंड

वसई-विरार महापालिकेचा बोळिंज येथील ३८५ कोटी रुपयांचा मलनिस्सारण प्रकल्प हा प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि निकृष्ट नियोजनाचा पुरावा आहे. ९ वर्षांतच प्रकल्पाची दुर्दशा झाल्याचा पर्दाफाश करत विरोधी पक्षनेते मनोज पाटील केला.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 25, 2026 | 05:23 PM
वसई-विरार महापालिकेचा ३८५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची दुर्दशा! सांडपाणी खाडीत; प्रशासनाने आकारला दंड

वसई-विरार महापालिकेचा ३८५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची दुर्दशा! सांडपाणी खाडीत; प्रशासनाने आकारला दंड

Follow Us
Close
Follow Us:

वसई-विरार महापालिकेचा बोळिंज येथील ३८५ कोटी रुपयांचा मलनिस्सारण प्रकल्प हा प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि निकृष्ट नियोजनाचा पुरावा आहे. ९ वर्षांतच प्रकल्पाची दुर्दशा झाल्याचा पर्दाफाश करत विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला. ‘५० वर्षे टिकणारा प्रकल्प ९ वर्षात सडतो, म्हणजे ही केवळ चूक नसून हा सरळसरळ निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचार आहे’, असा घणाघाती आरोप करत पाटील यांनी अधिकाऱ्यांना थेट जबाबदार धरले.

कोट्यवधी खर्च करून उभारलेल्या प्रकल्पाचे बीम, पिलर सडणे आणि संरचना कोसळण्याच्या स्थितीत येणे, हे प्रशासनाच्या ढिसाळ देखरेखीचे द्योतक असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकल्पाच्या अपयशामुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा गंभीर मुद्दाही त्यांनी मांडला. ३० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प असूनही केवळ ८ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होते, तर उर्वरित सांडपाणी विनाप्रक्रिया खाडीत सोडले जाते.

धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या २५ दिवसांपासून प्रकल्प पूर्णपणे बंद असून सर्व घाण पाणी थेट समुद्रात सोडले जात आहे. ‘ही केवळ दुर्लक्ष नाही, तर पर्यावरणीय गुन्हा आहे’, असा संतापजनक आरोप पाटील यांनी केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार दररोज दोन टन गाळ निघणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात फक्त पाच किलो गाळ निघत असल्याची बाब समोर आली आहे. यावरून प्रकल्पाची प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच चालते की काय, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ‘अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली की जाणीवपूर्वक दुर्लक्ष?’ असा सवाल उपस्थित करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी संपूर्ण प्रकरणावर श्वेतपत्रिका जाहीर करण्याची आणि संबंधित अधिकारी, सल्लागार व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. प्रशासनाच्या या गंभीर हलगर्जीपणामुळे महापालिकेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाई होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे महापालिकेला राष्ट्रीय हरित लवाद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोट्यवधींचा दंड भरावा लागत आहे. हा आर्थिक बोजा अखेरीस करदात्यांवरच टाकला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ‘चुका अधिकाऱ्यांच्या आणि दंड जनतेच्या पैशातून हा कोणता न्याय?’ असा संतप्त सवाल केला जात आहे.
निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप करत, स्टेनलेस स्टीलऐवजी माईल्ड स्टील वापरल्याने संपूर्ण यंत्रणा गंजून निकामी झाल्याचेही उघड झाले. यावरून केवळ काम पूर्ण दाखवण्यासाठी, निधी खर्चासाठी घाईघाईने निर्णय घेतल्याचा आरोप होतो आहे.

Web Title: The plight of vasai virar municipal corporations 385 crore project sewage discharged into creek administration levies fine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • pollution
  • Vasai-Virar Municipal Corporation

संबंधित बातम्या

Bombay High Court चा ऐतिहासिक निर्णय; वसई-विरार कर्मचाऱ्यांना १७ वर्षांनी ‘समान काम, समान वेतन’ न्याय
1

Bombay High Court चा ऐतिहासिक निर्णय; वसई-विरार कर्मचाऱ्यांना १७ वर्षांनी ‘समान काम, समान वेतन’ न्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.