Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

100 रुपयांचा स्टॅम्प पेपर बंद झाल्याने नागरिकांना बसतोय मोठा आर्थिक फटका; 500 पेक्षा 100 ची विक्रीच जास्त

नोव्हेंबर महिन्यात 100 रुपयांचे अखेरचे दोन हजार 490 मुद्रांक 2 लाख 49 हजार तर 500 रुपयांचे 6 हजार 510 मुद्रांक 32 लाख 55 हजार असे एकूण 35 लाख 4 हजार रुपये मूल्य आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 05, 2024 | 12:23 PM
स्टॅम्प ड्युटीमधून २६ कोटी तिजोरीत

स्टॅम्प ड्युटीमधून २६ कोटी तिजोरीत

Follow Us
Follow Us:

यवतमाळ : शासकीय कामासह शैक्षणिक व विविध व्यवहारासाठी चालणारा 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर बाद ठरविण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्यांना 500 रुपयांचा मुद्रांक खरेदी करावा लागत आहे. नोव्हेंबर महिन्यात अखेरचे 100 रुपयांचे अडीच हजार मुद्रांक विक्री करण्यात आले तर 500 रुपयांचे तब्बल साडेसहा हजार मुद्रांक विक्री झाले.

हेदेखील वाचा : Pune Metro: स्वारगेट-कात्रज मार्गावर चार मेट्रो स्थानकं होणार; महामेट्रो स्वखर्चाने उभारणार, महापालिकेचा प्रस्ताव

सप्टेंबर महिन्यात 100 रुपयांचे 18 हजार 440 मुद्रांक विक्री झाले. त्याचे मूल्य 18 लाख 44 हजार इतके होते. 500 रुपयांचे तीन हजार 316 मुद्रांक विक्री झाले. त्याचे मूल्य 16 लाख 58 हजार एवढे होते. सप्टेंबर महिन्यात एकूण 35 लाख दोन हजार रुपये मुद्रांक विक्रीतून प्राप्त झाले. ऑक्टोबर महिन्यात 100 रुपयांचे 13 हजार 300 मुंद्राक 13 लाख 30 हजार, 500 रुपयांचे 9 हजार 128 मुद्रांक 45 लाख 64 हजार असे एकूण 58 लाख 94 हजार रुपये मूल्य आहे.

नोव्हेंबर महिन्यात 100 रुपयांचे अखेरचे दोन हजार 490 मुद्रांक 2 लाख 49 हजार तर 500 रुपयांचे 6 हजार 510 मुद्रांक 32 लाख 55 हजार असे एकूण 35 लाख 4 हजार रुपये मूल्य आहे. तीन महिन्यांतील मुद्रांक विक्रीची आकडेवारी पाहता 100 रुपयांच्या मुद्रांकाचीच अधिक विक्री दिसून येते. जिल्हाधिकारी, तहसील, पुरवठा, पंचायत समिती, शिक्षण विभाग आदी विभागांतील शासकीय योजना, विविध कामांसाठी प्रतिज्ञापत्र, खरेदी-विक्रीचे किरकोळ व्यवहार आदी कामांत नागरिकांना स्टॅम्प पेपरची गरज भासते.

पूर्वी 20, 50 च्या स्टॅम्प पेपरवर व्हायची कामे 

पूर्वी 20, 50 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरच अधिक शासकीय कामे व आर्थिक व्यवहार होत होती. कालांतराने हे दोन्ही स्टॅम्प पेपर बंद करून 100 रुपयांचा मुद्राक आणण्यात आला. या मुंद्राकावर विविध प्रतिज्ञापत्र, किरकोळ आर्थिक व्यवहार होत होते. तसेच मुद्रांकाचे हे दरही नागरिकांना रास्त व वाजवी वाटत होते. परंतु, महिनाभरापूर्वी 100 रुपयांऐवजी 500 रुपयांचा मुद्राक विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर होणारी कामे आता 500 रुपयांवर गेली असल्याने कमालीची नाराजी पसरली आहे.

हेदेखील वाचा : देवेंद्र फडणवीस आज घेणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; पंतप्रधान मोदी, अमित शहांसह अनेक बडे नेते राहणार उपस्थित

Web Title: Peoples are facing a huge financial hit due to the discontinuation of rs 100 stamp paper nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 12:23 PM

Topics:  

  • maharashtra news

संबंधित बातम्या

Nagpur Airport: नागपूर विमानतळाचा कायापालट! देशातील सर्वात मोठे लॉजिस्टिक हब उभारणार; ‘जीएमआर’ची ₹३२०० कोटींची योजना
1

Nagpur Airport: नागपूर विमानतळाचा कायापालट! देशातील सर्वात मोठे लॉजिस्टिक हब उभारणार; ‘जीएमआर’ची ₹३२०० कोटींची योजना

Ramai Awas Gharkul Scam: ‘रमाई आवास’ घरकुल योजनेत मोठा घोटाळा; अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप
2

Ramai Awas Gharkul Scam: ‘रमाई आवास’ घरकुल योजनेत मोठा घोटाळा; अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप

रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर ! ४ जणांचा मृत्यू, ९ जखमी, १,०३२ नागरिकांचे स्थलांतर
3

रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर ! ४ जणांचा मृत्यू, ९ जखमी, १,०३२ नागरिकांचे स्थलांतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.