Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

पुढील तीन वर्षांत पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर हे अंतर कोस्टल रोडने अवघ्या अर्ध्या तासात कापणे शक्य होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 21, 2025 | 07:40 PM
Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
Follow Us
Follow Us:
  • दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा
  • तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर
  • मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
Dahisar-Bhayander Coastal Road: केंद्रीय मिठागार मंत्रालयाने आपली जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्यामुळे, दहिसर ते भाईंदर हा महत्त्वाचा महामार्ग तयार करण्याचा मोठा अडथळा आता दूर झाला आहे. हा मार्ग पुढील तीन वर्षांत पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर हे अंतर कोस्टल रोडने अवघ्या अर्ध्या तासात कापणे शक्य होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

मिठागराची जमीन हस्तांतरित, प्रकल्पाचा मार्ग मोकळा

गेल्या चार-पाच वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, दहिसर-भाईंदर ६० मीटर रस्त्यासाठी आवश्यक असलेली ५३.१७ एकर जमीन केंद्रीय मिठागार मंत्रालयाने राज्य शासनाच्या माध्यमातून मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे दहिसर ते भाईंदर आणि पुढे वसई-विरारपर्यंत जाणारा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रकल्प तपशील आणि खर्च

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सध्या सुरू असलेला कोस्टल रोड उत्तनपर्यंत येणार आहे. तेथून दहिसर-भाईंदर हा ६० मीटर रुंदीचा रस्ता मीरा रोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत जोडला जाईल आणि पुढे वसई-विरार शहरांनाही जोडला जाणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. एल अँड टी (L&T) ही कंपनी हे काम करणार असून, पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी येणारा सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे.

राज्यातील परिवहन विभागाचे सर्व चेक पोस्ट होणार बंद? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लवकरच घेणार निर्णय

मच्छिमार बांधवांच्या मागणीला यश

यापूर्वी कोस्टल रोड उत्तन येथून विरारकडे समुद्रकिनाऱ्यावरून जाणार होता. मात्र, तेथील कोळी बांधवांनी याला विरोध केला होता. ही मागणी मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मांडली. त्यांच्या मागणीला मान्यता मिळाल्यामुळे, हा मार्ग आता उत्तन ते दहिसर आणि तेथून मीरा-भाईंदरमार्गे वसई-विरारकडे जमिनीवरून जाणार आहे. यामुळे कोळी बांधवांच्या रास्त मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केल्याचे सरनाईक यांनी सांगितले. भविष्यात या महामार्गामुळे मीरा-भाईंदर मुंबईशी अधिक जोडले जाईल आणि लवकरच मुंबई शहराचे उपनगर म्हणून आपली ओळख निर्माण करेल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

Web Title: Pratap sarnaik dahisar bhayandar coastal road update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 07:37 PM

Topics:  

  • BMC
  • Mumbai
  • Mumbai News
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
1

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा
2

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा
3

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत
4

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.