
रविंद्र भालेराव (वय ६१, रा. स.नं. १३०, दांडेकर पुल) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सागर रविंद्र भालेराव (वय २७, रा. दांडेकर पुल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रविंद्र भालेराव हे सुतार काम करत होते. त्यांचा मुलगा सागर देखील त्यांच्यासोबतच सुतार काम करत असत. सागर याला दारूचे व्यसन होते. तो सतत दारू प्यायचा. तो अविवाहित आहे. दांडेकर पुल परिसरात कुटूंबासह हे दोघेही राहत होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात (दि. ७ फेब्रुवारी) सायंकाळी सागर दारू पिल्याने त्यांच्यात वादविवाद झाले. वाद कडाक्याचे झाल्यानंतर रागाच्या भरात सागर याने गाडीतील पेट्रोल काढले व वडिलांच्या अंगावर टाकले. पेट्रोल टाकल्यानंतर काडीपेटीने त्यांना पेटवून दिले. पेट्रोलमुळे अचानक भडका उडाला आणि वडिल रविंद्र हे आगीत होरपळले.
नागरिकांनी त्यांच्यावर पाणी टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात ते ४५ ते ५० टक्के भाजले गेले. त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी मुलगा सागर याच्यावर खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुभाष महाले हे करत आहेत.
हे सुद्धा वाचा : सहावीतील विद्यार्थ्यावर चार वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचार; पॉक्सोअंतर्गत गुन्हा
संशयाच्या भरात तरुणीची गोळ्या झाडून निर्घृण हत्या
मुंबईच्या गोवंडी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका महिलेने १९ वर्षीय तरुणीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मृत तरुणीचे नाव शिफा असे आहे. पोलिसांनी एका २५ वर्षीय तरुणींसह २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी घडली.