
Rahul Gandhi
Rahul Gandhi on BJP : कॉंग्रेसच्या 139 व्या स्थापना दिवशी नागपुरातून कॉंग्रेसची महारॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडत कॉंग्रेसची विचारधार सांगितली. कॉंग्रेसच्या विचारधारेने सामान्य माणसाला त्याचा स्वतंत्र मतदानाचा हक्क मिळवून दिला. तत्पूर्वी या देशात राजेशाही होती. परंतु, ही राजेशाही संपवून गरिबातल्या गरीब माणसाला त्याचा हक्क मिळवून देण्याचे काम संविधानाने केले. हे पवित्र संविधान देशात आणण्यासाठी त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कॉंग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली.
कॉंग्रेसने देशाला संविधान दिले
बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले त्याच्यावर अनेक विद्वानांनी काम केले. त्यानंतर कॉंग्रेस कार्यकाळातच हे संविधान देशात लागू झाले. परंतु, याउलट भाजपमध्ये राजेशाही चालू आहे. तेथे खासदारालासुद्धा स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार नाही. तसेच, सत्तेचे केंद्रीकरण करीत लोकशाही संपवण्याचे सर्वात विघातक काम भाजपमध्ये सुरू आहे. असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
भाजपमध्ये गुलामगिरी
राहुल गांधी म्हणाले, मी एकदा BGP खासदाराला भेटलो. यापूर्वी मी काँग्रेस पक्षात होतो. ते म्हणाले, मी भाजपमध्ये आहे पण माझे मन काँग्रेसमध्ये आहे. म्हणजे माझा देह भाजपमध्ये आहे. परंतु, मन कॉंग्रेसमध्ये आहे आणि मनाला देहाची पिडा सांगायची भीती वाटत आहे. आपण आपले मन का बनवू शकत नाही? तुम्ही खासदार आहात, तुम्ही मला इशारा देत आहात. आपण आपले मन का बनवू शकत नाही? राहुलजी, भाजपमध्ये गुलामगिरी सुरू आहे. भाजपमध्ये गुलामगिरी आहे. आम्ही बोलूच शकत नाही.
वरून ऑर्डर येते
आमचे कोणी ऐकत नाही. वरून ऑर्डर येते. जसे राजाचा आदेश आधी येतो. मग तुम्हाला ते आवडो किंवा न आवडो, तुम्हाला ते फॉलो करावे लागेल. भाजपमध्ये गुलामगिरी सुरू झाली. जीएसटी लागू केल्याचा शेतकऱ्यासाठी काय अर्थ आहे? त्यांची विचारधारा ही राजांची विचारधारा आहे. कोणाचेही ऐकू नका. वरून आदेश येतात आणि त्याचे पालन करावे लागते. काँग्रेस पक्षात तळागाळातून आदेश येतो. आमचे कार्यकर्ते वरील नेत्यांना अडवू शकतात. मी तुमच्याशी सहमत नाही. लोक म्हणतात,काँग्रेस पक्षाने काय केले?स्वातंत्र्यापूर्वी 5-6 राजे होते, इंग्रज या देशात यायचे, कुणाला 19 तोफांची सलामी दिली जायची. संविधान काँग्रेस पक्षाने दिले आहे. सर्व अधिकार संविधानातून आले आहेत. राजाला जे काही करायचे आहे,
आंबेडकरांनी वर्षानुवर्षे संघर्ष केला
संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला एक मत दिले आहे. आंबेडकरांनी वर्षानुवर्षे संघर्ष केला. काँग्रेस पक्षाने सर्वांना स्वातंत्र्य दिले. देशाचा लगाम भारतीय नागरिकांकडेच राहिला पाहिजे. पूर्वी देश राजे चालवत होते, पण आता प्रत्येक नागरिकच चालवतात. हे कॉंग्रेसने दिलेले देणे आहे. परंतु, आता हुकूमशाही सुरू आहे, वरून अॉर्डर आली की खाली ती सर्वांनी पाळायची अशी राजेशाही ही आरएसएसची विचारधारा आहे.
प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेने स्वतंत्र अधिकार दिले आहेत. तुमच्या अधिकारामुळे देशातील संस्थांवर लोकांचे नियंत्रण आहे. त्या मोठ मोठ्या संस्था संपवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. देशातील महत्त्वाच्या संस्था संपवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. ईडी, सीबीआय, केंद्रीय निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय या सर्वांचे स्वतंत्र अधिकार काढून टाकण्याचे काम भाजपकडून चालू आहे.