
मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांची मोठी घोषणा (Photo Credit- X)
मुख्यमंत्री विजय यांचे हे पहिलेच विधान मित्रपक्ष आणि राजकीय विरोधक या दोघांसाठीही मोठा संदेश मानला जात आहे. “माझ्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही पॉवर सेंटर असणार नाही. सत्तेचे एकमेव केंद्र मीच राहीन,” असे विजय यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे आघाडीतील घटक पक्षांवर त्यांचे पूर्ण नियंत्रण राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आपल्या संबोधनात स्वतःचा उल्लेख ‘थम्बी’ (लहान भाऊ) असा करत विजय यांनी मित्रपक्षांच्या दबावाला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले. विरोधकांना इशारा देताना ते म्हणाले, “मी स्वतः काहीही चुकीचे करणार नाही आणि माझ्या सोबत कोणाला चुकीचे करू देणार नाही. जर कोणाच्या मनात चुकीचे इरादे असतील, तर त्यांनी ते त्वरित सोडून दिले पाहिजेत.” त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनावर त्यांची घट्ट पकड असल्याचे दिसून आले.
देशातील अनेक राज्यांत भाजपची सत्ता; हरियाणा ते पश्चिम बंगाल…9 राज्यांत प्रथमच भाजपचे मुख्यमंत्री
सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणाऱ्या सर्व नेत्यांचे विजय यांनी व्यासपीठावरून आभार मानले. यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा उल्लेख ‘माय ब्रदर’ (माझा भाऊ) असा केला. विजय यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल, सेल्वापेरुंथगई आणि प्रवीण चक्रवर्ती यांचे विशेष आभार मानले. तसेच माकप (CPI-M), व्हीसीके (VCK) आणि भाकप (CPI) च्या नेत्यांनाही धन्यवाद दिले. आपल्या सोशल मीडिया वॉरियर्सचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानताना ते भावूक झाले होते.
“मी कोणी देवदूत नाही, मी तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे,” असे म्हणत विजय यांनी जनतेला साद घातली. आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी त्यांनी जनतेकडे थोडा वेळ मागितला आहे. “मी अशी कोणतीही आश्वासने देणार नाही जी मी पूर्ण करू शकणार नाही. मात्र, तुमच्या सर्वांच्या सोबतीने आपण अशक्य गोष्टीही साध्य करू शकतो असा मला विश्वास आहे. मला थोडा वेळ द्या, मी हळूहळू सर्व आश्वासने पूर्ण करेन. जनतेच्या एका पैशालाही मी हात लावणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
भाजपमध्ये अमित शाह हेच खरे सम्राट; पक्ष संघटनेपासून मंत्रालयापर्यंत सर्वत्र दबदबा
मंत्रीपदाची शपथ घेणारे नऊ व्यक्ती पुढीलप्रमाणे आहेत: ‘बुसी’ एन. आनंद, अधव अर्जुना, के.जी. अरुणराज, के.ए. सेनगोट्टैयन, पी. वेंकटरमणन, सी.टी.आर. निर्मलकुमार, ए. राजमोहन, टी.के. प्रभू आणि एस. कीर्तना.