Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Zilla Parishad राज्यात दुसऱ्या क्रमांकावर; ‘माझी वसुंधरा’त दमदार कामगिरी

माझी वसुंधरा अभियानामध्ये रायगड जिल्हा परिषदेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकविला आहे. ग्रामपंचायत गटात राज्यस्तरीय व विभागस्तरावर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 19, 2026 | 04:49 PM
रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर, उपाध्यक्षपदी मधुकर पाटील बिनविरोध

रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर, उपाध्यक्षपदी मधुकर पाटील बिनविरोध

Follow Us
Close
Follow Us:
  • माझी वसुंधरा अभियानात यश
  • ५ कोटी ५० लाखांची बक्षिसे पटकावली
  • रायगड जिल्हा परिषद राज्यात द्वितीय
माझी वसुंधरा अभियानामध्ये रायगड जिल्हा परिषदेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकविला आहे. ग्रामपंचायत गटात राज्यस्तरीय व विभागस्तरावर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या अभियानाचा निकाल जाहीर झाला. जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायतींनी विविध गटांत यश मिळवत ५ कोटी ५० लाखांची बक्षिसे पटकावली आहेत.
माझी वसुंधरा अभियान ५.० हे १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आले. यात केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन त्रयस्त यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोन्ही मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान ५.० मधील लोकासंख्यानिहाय विविध गटांतिल पुरस्कार जाहीर करण्यात आले.

१ ते १.५ हजार लोकसंख्या गटांत खालापूर तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक (बक्षीस १ कोटी) व भूमी थीमॅटिकमध्ये राज्यात उच्चतम कामगिरीचा प्रथम क्रमांक (बक्षीस ५० लक्ष) अशी १.५० कोटीची बक्षीसे पटकवली आहेत. तसेच ५ ते १० हजार लोकसंख्येत राज्यस्तरावर खालापूर तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक व १ कोटीचे बक्षीस पटकवले आहे. याशिवाय ६ ग्रामपंचायतींनी कोकण विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून प्रत्येकी ५० लक्षचे बक्षीस मिळवले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड व तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबविण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियानामध्ये रायगड जिल्ह्यातील विविध गावे हिरीरीने भाग घेत असून यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होणार आहे. राज्यपातळीवर उत्कृष्ट ठरलेल्या ग्रामपंचायतींचा, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकार्यांचा सत्कार मुंबईत शनिवार (ता.२१) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

जिल्ह्यात १० हजारपेक्षा जास्त लोकसंख्या गटात वासांबे ग्रामपंचायत, ५ ते १० हजार लोकसंख्येत चैक ग्रामपंचायत, ३ ते ५
हजार लोकसंख्येत तांबाटी ग्रामपंचायत, २ ते ३ हजार लोकसंख्येत तुपगाव ग्रामपंचायत, १.५ ते २ हजार लोकसंख्येत वडवळ ग्रामपंचायत व १ ते १.५ हजार लोकसंख्येत नारंगी ग्रामपंचायतीने यश मिळविले. तसेच कोकण विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे गटविकास अधिकारीचा पुरस्कार खालापूर पंचायत समितीच्या संदीप कराड व जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे गटविकास अधिकाऱ्यांचा पुरस्कार पोलादपूरच्या दिप्ती घाट व रोह्याच्या शुभदा पाटील यांना मिळाला आहे.

Web Title: Raigad zilla parishad performs strongly in majhi vasundhara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • raigad

संबंधित बातम्या

Murud-Janjira Fort : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! 26 मेपासून ‘हा’ किल्ला 3 महिन्यांसाठी बंद, पावसाळी सुरक्षेचा निर्णय
1

Murud-Janjira Fort : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! 26 मेपासून ‘हा’ किल्ला 3 महिन्यांसाठी बंद, पावसाळी सुरक्षेचा निर्णय

Karjat News: 640 एकर वनजमिनीवर वाद! टोरंट प्रकल्पामुळे आदिवासींच्या उदरनिर्वाहावर संकट? पाली भागातील आदिवासी संतप्त
2

Karjat News: 640 एकर वनजमिनीवर वाद! टोरंट प्रकल्पामुळे आदिवासींच्या उदरनिर्वाहावर संकट? पाली भागातील आदिवासी संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.