
माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांची मनमानी? रात्री एकट्या तरुणीला सेवा नाकारल्याने संताप; कारवाईची मागणी
Matheran News: विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा
शिवसेना महिला आघाडी माथेरान शहर संपर्क संघटक प्रीती कळंबे यांची कन्या प्रिया या आठ ऑगस्ट 2026 शनिवार रोजी रात्री पुणे येथून माथेरान दस्तुरी नाका येथे पोहचल्या.दस्तुरी नाका येथील इ रिक्षा स्टँड येथे आल्यावर रात्री १० वाजता डायबेटिक रुग्ण असलेल्या प्रिया कळंबे यांनी आपल्याला असलेल्या आजाराची माहिती इ रिक्षा चालक यांना देत रिगल नाका येथे सोडण्याची सूचना केली. कळंबे कुटुंब रिगल नाका पासून पुढे इको पॉईंट भागात राहतात आणि रात्रीच्या वेळी एकटी मुलगी त्या भागातून जाणे जिकिरीचे होते.तिकडे प्रिया कळंबे यांनी आपल्या आईला रिगल नाका येथे घेण्यासाठी यायला सांगितले होते.पण रिक्षा चालक यांच्या मनात काहीतरी वेगळे होते.दस्तुरी नाका येथे असलेल्या पर्यटकांना रिक्षा मध्ये भरून प्रवास देण्याची तयारी केल्यावर प्रिया कळंबे यांनी मला रिगल नाक्यावर सोडा अशी विनवणी केली. रिगल हॉटेल पासून प्रबळ हाऊस बंगला इको पॉईंट रोड इथे राहत असलेल्या प्रिया कळंबे यांना संबंधित रिक्षा चालक यांना आपण एकटे असून रिगल नाका पर्यंत तरी सोडावे असे विनवणी करीत होती.
पर्यटक यांच्याकडून जास्त पैसे देणारे भाडे मिळणार असल्याने संबंधित रिक्षाचालक याने आपली गाडी बंद केली.त्यानंतर रिक्षा चालक याने रिक्षा बंद करून साईड ला उभा राहिला असता प्रिया कळंबे यांनी आपल्या घरी फोन करून रिक्षा चालक आणि रिक्षा यांचे फोटो पाठवून देत हा रिक्षा चालक रिक्षा घेऊन येत नसल्याची माहिती दिली. पोलिस तक्रार करण्याची भाषा केल्यानंतर संबंधित रिक्षा चालक याने शेवटी साडे दहा वाजता रिगल नाका येथे सोडले पण प्रवासात उद्धट बोलत असल्याची प्रिया कळंबे यांची तक्रार आहे.तर प्रिया कळंबे यांनी 150 रुपये भाडे देण्याची तयारी दाखवली होती,तरी देखील इ रिक्षा चालक ऐकत नव्हता.स्टँड ला पर्यटक होते त्यांना सोडायला तयार झाला. हे कितपत योग्य आहे असा प्रश्न कळंबे यांनी उपस्थित केला आहे.
त्या दिवशी त्या रिक्षा चालक बोलत होता माझ्या मुलीला ह्या आधी रिक्षा नव्हती तर काय करायची.ही कोणती पद्धत आहे आणि आता मध्ये फरक आहे हे माझ्या मुलीच उत्तर होता.आता रिक्षा असताना मी रात्री का चालत जाऊ असे बोलल्यावर पूर्वी कुठे इ रिक्षा होत्या त्यावेळीं चालतच जायचे ना?असा प्रश्न त्या रिक्षाचालकाने प्रिया कळंबे यांना विचारला.माथेरान च्या मुलीसोबत घडू नये त्या साठी तुम्ही योग्य ती काळजी घ्यावी आणि रिक्षा संघटनेसोबत बोलून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकारी प्रीती कळंबे यांनी दिली.