Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : “जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा…”, जनसुरक्षा विधेयकाला विरोध, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ७८ ठिकाणी निदर्शने

जिल्हाधिकारी कार्यालये याठिकाणी २२ एप्रिल रोजी एकूण ७८ ठिकाणी निदर्शने करण्यात आली होती.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 12, 2025 | 03:24 PM
Raigad News : “जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा…”, जनसुरक्षा विधेयकाला विरोध, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ७८ ठिकाणी निदर्शने
Follow Us
Close
Follow Us:

अलिबाग : ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ विधीमंडळाच्या अधिवेशनात पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले आहे. असं असलं तरी हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे हे विधेयक मागे घ्यावे,रद्द करावे, या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार , विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष – संघटनांनी केला आहे.

यापूर्वी जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यातील तहसील कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये याठिकाणी २२ एप्रिल रोजी एकूण ७८ ठिकाणी निदर्शने करण्यात आली होती . ३० जून रोजी मुंबई येथे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आझाद मैदानावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

साताऱ्यात डॉल्बीला तीव्र विरोध; ज्येष्ठ नागरिकांकडून काढली जाणार रॅली

सदर विधेयक मंजूर करण्यापूर्वी विधीमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले होते. या समितीने जाहीर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्या नुसार आजपर्यंत दिलेल्या तारखेला या विधेयकाला प्रत्यक्ष व दिलेल्या संकेतस्थळावर सुचना व विरोध नोंदवण्यात आला आहे.राज्य भरातून १३००० हरकती दाखल करण्यात आलेल्या होत्या . त्यापैकी ९५०० हरकती सदर विधेयक रद्द करा हे स्पष्ट मांडणा-या होत्या.

सतेज पाटलांचं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाचं आवाहन, म्हणाले; आठवड्यातून एक तरी…

एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल होण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे .यावरून जनसामान्यांच्या मनात या विधेयकाबाबत काय आहे हे लक्षात येते. तरीही त्या सर्व हरकतींची दखल न घेता हा कायदा पुढे रेटण्यात आला.तसेच सदर विधीमंडळाच्या संयुक्त समिती ने कोणालाही प्रत्यक्ष म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही. हे लोकशाही प्रक्रियेला साजेसे नाही. याचा आम्ही यापूर्वी निषेध केला आहे.हा सर्व‌ विरोध‌ व‌ जनमानस डावलून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पाशवी बहुमताच्या जोरावर सदर कायदा मंजूर करण्यात आला.

हा कायदा लोकशाही तत्त्वांना बाधा आणणारा आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्कांची, सरकार ला लोकशाही मार्गाने जाब विचारणारे यांची गळचेपी करणारा आहे .आता या कायद्याच्या विरोधात सामान्य, निडर नागरिकच उतरतील.‌ म्हणून या कायद्याच्या विरोधात १४ ऑगस्ट २०२५ रोजी , स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला
मुंबईमधे नागरिकांचा जोरदार विरोध नोंदविण्यासाठी व राज्यभर आंदोलनाचा कार्यक्रम घोषित करण्यासाठी निर्धार परिषद आयोजित करण्यात येत आहे.ही परिषद यशवंतराव चव्हाण सेंटर मधे दुपारी एक ते पाच या वेळेत घेण्यात येईल.

सदर परिषदेत अनेक मान्यवर, कलाकार, पत्रकार, वकील, साहित्यिक, व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते उपस्थित रहाणार आहेत.
त्यामधेपी. साईनाथ ,किरण माने, सुरेश खोपडे , संभाजी भगत , प्रज्ञा पवार , तुषार गांधी , एस. एम. देशमुख ,ॲड मिहिर देसाई , तिस्ता सेटलवाड , दीपक पवार ,मिलिंद रानडे, डॉ डी एल कराड, आनंद पटवर्धन, धनाजी गुरव हे मान्यवर आहेत.

तसेच विविध राजकीय, सामाजिक नेते उपस्थित रहाणार आहेत. सुभाष लांडे, प्रकाश रेड्डी,शैलेंद्र कांबळे, उल्का महाजन, ब्रायन लोबो ,कॉ भारत पाटणकर ,किशोर ढमाले , आमदार विनोद निकोले , अजित नवले ,बाळाराम पाटील ,उदय भट, शाम गायकवाड , अबू आझमी , डॉ. भालचंद्र कांगो हे मांडणी करणार असून महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे , हर्षवर्धन सपकाळ , शरद पवार आवर्जून उपस्थित रहाणार आहेत.

Web Title: Raigad news mace on the fundamental rights of the people opposition to the public safety bill protests at 78 places on the eve of independence day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • Alibaug
  • Marathi News
  • Mumbai

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?
1

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई
2

Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं
3

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप
4

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.