अलिबाग तालुक्यातील कुरुळ बायपास ते बेलकडे जाणाऱ्या महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवास करताना वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अलिबाग तालुक्यात ग्रामपंचायतींकडून बांधकाम परवानगीचा अधिकार काढून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेल्यापासून नियमबाह्य परवानग्या देत असल्याचा आरोप होत आहे.
अलिबागची सारा वर्तक हिने आपल्या प्रतिभेच्या जोरावर ‘सागरकन्या’चा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे.अलिबागच्या या मुलीने मिळवलेला हा मान संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली.
निषेधकर्त्यांनी तयार केलेल्या दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांनी मारहाण करत संताप व्यक्त केला. त्यानंतर पुतळा जाळून दानवे यांच्या ‘पाखंडी’ वागणुकीला तीव्र विरोध दर्शवण्यात आला.
मुंबईसारख्या वेगवान शहरात संथ, ग्रामीण भागातून आलेले लोक लगेच जुळवून घेऊ शकत नसत. त्यामुळे चेष्टेत विचारलं जाणारं वाक्य “अलिबागहून आलाय का?” प्रचलित झालं.
अलीकडच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या गुंतवणूकदारांकडून जमिनी खरेदी केली जात आहेत. परिणामी, स्थानिक शेतकरी आपली जमीन विकून उपजीविकेच्या साधनांपासून वंचित होत आहेत.
सदर खटल्याची सुनावणी अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात घेण्यात आली, सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता प्रसाद पाटील यांनी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली.
रायगडच्या कनकेश्वर मंदिर परिसरात सोशल मीडियावरून ओळखलेल्या तरुणाने प्रेयसीवर लोखंडी हातोड्याने हल्ला केला. ती गंभीर जखमी असून आरोपी आणि त्याच्या मित्रांचा शोध पोलिस करत आहेत.
अखेर कामगारांच्या हक्करक्षणासाठी अलिबागमध्ये नवीन न्यायालयाचे उद्घाटन झाले आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते या न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
बॉलीवूडचा शहेनशाह ११ ऑक्टोबर रोजी ८३ वर्षांचा झाला. बिग बी यांनी स्वतःला एक अद्भुत भेट दिली आहे. मुंबईजवळील अलिबागमध्ये या अभिनेत्याने कोट्यावधीच्या 3 जागा विकत घेतल्या आहेत
राज्य महामार्ग असो किंवा राष्ट्रीय महामार्ग खड्यांच्या समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहेत. अलिबागपासून वडखळ रस्ता केवळ 22 किमीचा. 22 किमीचा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत दुरवस्थेत असून जीवघेणा होत आहे.
जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे व उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जनआक्रोश आंदोलन करत – MSIDC व कंत्राटदाराला जाहीर इशारा दिला आहे.
लोकांनी केलेल्या मतदानाची चोरी होत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी केला होता याच पार्श्वभूमीवर रायगड काँग्रेसने कॅन्डल मार्चचं आयोजन केलं.
रायगडच्या अलिबाग तालुक्यातील मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागाव मध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. नागाव परिसर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी या ऑकेथॉन मध्ये गावकऱ्यांसह विद्यार्थी देखील सहभागी झाले…