Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : विजेच्या धक्क्याने तीन दुभत्या म्हशींचा मृत्यू; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

कर्जत तालुक्यात विजेच्या तारेचा धक्का लागल्याने कर्जतमधील तीन दुभत्या म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. .यासगळ्यात बळीराजाचं आर्थिक नुकसान झालं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 19, 2025 | 05:00 PM
Raigad News : विजेच्या धक्क्याने तीन दुभत्या म्हशींचा मृत्यू; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Raigad News : विजेच्या धक्क्याने तीन दुभत्या म्हशींचा मृत्यू; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

कर्जत / संतोष पेरणे: तालुक्यातील चांधई येथे शेतामध्ये चारा खाण्यासाठी गेलेल्या तीन म्हशींचा विजेच्या तारेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला. या घटनेने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून दुभत्या म्हशी यांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान,या प्रकरणी महावितरण कंपनी कडून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी संबंधित म्हशींच्या मृत्यूचे पंचनामे करण्यात आले असून ते सर्व पंचनामे वरिष्ठ कार्यालयाला पाठवले जातील अशी माहिती महावितरण कडून देण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असून सतत सुरू राहिलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे.त्यात आता शेतामध्ये पडलेली विजेची वाहिका बाजूला करण्याची सूचना चांधई गावातील शेतकऱ्यांनी दिली होती.मात्र तरी देखील महावितरण कडून त्याबाबत निरुत्साह दाखवण्यात आला.चांधई गावातील शेतकरी महेश बंडू थेर हे आपल्या दुभत्या म्हशी घेवून शेतजमिन असलेल्या ठिकाणी गेले होते.रविवारी संध्याकाळी म्हशी आणि गुरे शेतात बागडत असताना तेथील जमिनीकडे झुकलेली विजेची तार यांचा धक्का म्हशींना लागला.

Raigad News : अवकाळी पावसाने बळीराजा संकटात; नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करा, महेंद्र थोरवेंची मागणी

आधी विजेच्या खांबावरील तार तुटल्याचे लक्षात आले नाही. पण जसे सर्व प्राणी विजेच्या धक्क्याने थरथरायला लागले तेव्हा शेतकरी महेश थेर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तेथे असलेल्या गुरांपैकी काही गुरांना वाचविण्याचां प्रयत्न केला.मात्र तरी देखील तीन म्हशी यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.

Mansson Update: पहिल्याच पावसात बहरलं माथेरान ;निळ्याशार आकाशात रंगीबेरंगी उधळण

त्या घटनेची माहिती महावितरण कंपनीला देण्यात आली.त्यानंतर महावितरण कडून कडाव येथील सहायक अभियंता डांगी यांनी पंचनामे करून घेण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे.कडाव कार्यालयातून सर्व कागदपत्रे कर्जत उप विभागीय अधिकारी कार्यालयात पाठवण्यात आली असून कर्जत कार्यालयाकडून महावितरण कंपनी कडे प्रस्ताव सादर करण्यात येईल असे आश्वासन महावितरण चे उप अभियंता चंद्रकांत केंद्र यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

Web Title: Raigad news three milking buffaloes die due to electric shock farmers suffer financial loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • heavy rain update
  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Satara News : नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
1

Satara News : नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान
2

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Mumbai Rain Update : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल, नागरिकांचंही स्थलांतर
3

Mumbai Rain Update : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल, नागरिकांचंही स्थलांतर

Mumbai Rains News: मुंबईसह महाराष्ट्रात 3 जिल्ह्यात शाळा-कॉलेज बंद, पावसाने सामान्यांचे झाले हाल; तलाव भरले
4

Mumbai Rains News: मुंबईसह महाराष्ट्रात 3 जिल्ह्यात शाळा-कॉलेज बंद, पावसाने सामान्यांचे झाले हाल; तलाव भरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.