Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसामुळे पोलीस भरती प्रक्रियेत अडथळा : उमेदवारांची निराशा

 अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आजपासून (१९ जून) राज्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरूवात झाली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 19, 2024 | 06:15 PM
सौजन्य- सोशल मिडीया

सौजन्य- सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :   अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आजपासून (१९ जून) राज्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरूवात झाली. पण पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबईतील मीरा-भाईंदर आणि वसई विरार या भागातील पोलीस भरती प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.

याबाबत, अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मीरा-भाईंदर येथील भाईंदर वेस्ट येथील सुभाष चंद्र मैदानावरती पोलीस भरतीची शारीरिक चाचणी सुरू झाली.पण अचानक आलेल्या पावसामुळे मैदानावर पाणी साचले आणि मैदानात सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणी थांबवावी लागली. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार या मैदानावरती उपस्थित आहेत. परंतु मैदानावर पाणी साचल्याने शारीरिक चाचणी प्रक्रिया सुरू करण्यात अडथळा येत आहे.’’ असे पाठक यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यभरात पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस व राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) अंमलदार (शिपाई), विभागातील चालकपदासाठी आजपासून मैदानी चाचणीतून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. काही हजार पदासांठी लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील आयुक्तालय व कारागृह यांतील ५२७ पदांसाठी जवळपास ८६ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. भरती प्रक्रियेतील गैरप्रकार टाळण्यासाठी बायोमॅट्रिक पद्धत वापरण्यात येणार आहे.

दरम्यान, 17, 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज प्राप्त झाले आहेत. बँड्समन पदासाठी 41 जागा असून त्यासाठी 32,026 जणांनी अर्ज केले आहेत. चालक पदासाठी 1,686 जागांसाठी तब्बल 1 लाख 98 हजार 300 अर्ज मिळाले आहेत.  तुरूंग विभागातील शिपाई पदासाठी 1800 जागा उपलब्ध असून या पदासाठी 3 लाख 72 हजार 354  उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर पोलीस शिपाई पदासाठी सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज आले आहेत. 9595 जागांसाठी तब्बल 8 लाख 22 हजार 984 अर्ज आले आहेत.

 

Web Title: Rain hampers police recruitment process disappointment of candidates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2024 | 06:06 PM

Topics:  

  • Maharashtra Police Bharti
  • Police bharati

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.