बस स्थानकाचा परिसर आणि स्वच्छतागृहे केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यापुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी स्वच्छ राहिली पाहिजेत. त्यासाठी दर चार तासांनी स्वच्छता करणे अनिवार्य असेल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
शहापूर तालुक्यातील जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होत असून, याचा परिणाम वन्यजीव आणि पर्यावरणावर गंभीरपणे होत आहे. वाढत्या आगीच्या घटनांमुळे हिरवाई धोक्यात आली आहे.
बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसल्याने कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन सुमारे 80 टक्क्यांनी घटले आहे. परिणामी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बाजारात हापूसची आवक अत्यल्प होती.
धाराशिव येथील माविमला राज्यात दुसरा क्रमांक मिळाला असून, बचतगटांच्या बळावर महिलांनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशामुळे महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळाली आहे.
पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शहराच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य प्रशासकीय इमारतीतील सभागृहात ही बैठक झाली.
रखरखत्या उन्हामुळे आणि वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दरम्यान वाढत्या उष्प्यामुळे शहरासह महामार्गावर सुध्दा दुपारी वाहनांची रहदारीच्या संख्येत कमालीची घट दिसत असल्याचे दिसते.
‘ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, राज्यातील प्राचार्य, संचालक आणि प्राध्यापकांसाठी ते अनिवार्य करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी याबाबत निर्देश दिले.
दोघांच्या नावावर असलेल्या फ्लॅटची विक्री करण्याबाबत कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यास पत्नीने नकार दिल्यानंतर त्याचा राग आल्याने पतीने जोरात ठोसा मारून पत्नीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. स्कूल बस चालकांकडून होत असलेल्या मनमानी भाडेवाढीवर आता राज्य सरकार लगाम घालणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ तयार ठेवण्यात आला असून प्रशासन सतर्क झाले आहे.
Sanjay Shirsat On Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या एका विचित्र विधानामुळे राजकीय वादाला तोंड फुटले आहे.पालिकेची इमारत भुताटकीची असून येथे आत्म्यांचा वावर आहे.
जपानी मेंदूज्वराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत आहे. Devendra Fadnavis यांनी नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
अमरावतीतील परतवाडा व्हिडिओ स्कँडलमध्ये, मुख्य आरोपीच्या मोबाईलमधून आक्षेपार्ह व्हिडिओ डाउनलोड करून सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या उझर खान या दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
आंजर्ले येथील प्रसिद्ध Kadyavarcha Ganpati Temple मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्यात आली. या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून, सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
Dharashiv News Marathi : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बेकायदेशीरपणे सुरू असलेले महाकाली कला केंद्र तात्काळ बंद करण्यात आले. नियमभंग आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय अवघ्या २४ तासांत घेतला. नाट्यगृहाच्या सुधारणेसाठी अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती.