Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एआय’ वापरातून कारखान्यांची काटामारी, पवार काका-पुतणे मुग गिळून गप्प का? राजू शेट्टींचा सवाल

कारखानदार काटामारी व रिकव्हरी चोरून शेतकऱ्यांची सर्रास लूट करू लागले आहेत. याबाबत मात्र पवार काका-पुतणे मुग गिळून गप्प का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 22, 2025 | 06:14 PM
‘एआय’ वापरातून कारखान्यांची काटामारी, पवार काका-पुतणे मुग गिळून गप्प का? राजू शेट्टींचा सवाल

‘एआय’ वापरातून कारखान्यांची काटामारी, पवार काका-पुतणे मुग गिळून गप्प का? राजू शेट्टींचा सवाल

Follow Us
Close
Follow Us:

इचलकरंजी : राज्य सरकार एआय (कृत्रिम बुध्दीमता) तंत्रज्ञानावर भर देत उसाची उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी पवार काका-पुतण्याचा राज्यातील सर्व कारखानदारांना एकत्र करून पुढील हंगामापर्यंत हा प्रयोग संपुर्ण राज्यभर यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन वाढविल्यानंतर कारखानदार काटामारी व रिकव्हरी चोरून शेतकऱ्यांची सर्रास लूट करू लागले आहेत. याबाबत मात्र पवार काका-पुतणे मुग गिळून गप्प का आहेत ? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पुणे येथील साखर आयुक्त सिध्दराम सालिमट यांच्या बैठकीनंतर केला.

राज्य सरकारकडून एआय तंत्रज्ञानासाठी ५०० कोटी रूपयाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान दिले पाहिजे, उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढविली पाहिजे, यामध्ये दुमत नाही. यासाठी राज्य सरकार जे प्रयत्न करत आहे, ते स्वागतार्ह आहेत. राज्यातील कारखानदारांनी गाळप क्षमता वाढविली, मात्र उसाचे क्षेत्र तेवढेच राहिल्याने कारखाना कार्यक्षेत्रात उस कमी पडू लागल्यामुळे यावर्षी सर्वच कारखान्यांनी गाळप क्षमतेपेक्षा ३० ते ४० टक्के कमी उस गाळप केला आहे. यामुळे राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेवर परिणाम होऊन प्रक्रिया खर्चात वाढ होत आहे. राज्यातील कारखानदारांना माहित होते कि उसाचे क्षेत्र तेवढेच आहे. तरीही हव्यासापोटी संगनमताने गाळप क्षमता वाढविली आहे. याचाच परिणाम कारखान्यांच्या उत्पादन खर्चावर होऊन उत्पादन खर्चात वाढ होऊ लागली आहे.

सरकारकडून उपाययोजनेकडे दुर्लक्ष

राज्य सरकार व कारखानदारांचे शेतकऱ्यांच्या बद्दलचे बेगडी प्रेम असून खरच जर त्यांना शेतकरी हित जोपासायचे होते, तर उच्च न्यायालयाने एकरक्कमी एफआरपीचा निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आवश्यकता नव्हती. साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी राज्य सरकार व कारखानदार मिळून एआय तंत्रज्ञानावर भर देत आहेत. दुसरीकडे राज्यातील सर्व कारखानदार सर्रास काटामारी व रिकव्हरी चोरी करू लागले आहेत. याबाबत गेल्या अनेक वर्षापासून मागणी करूनही राज्य सरकारकडून कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही, अशी खंत शेट्टी यांनी व्यक्त केली.

रिकव्हरी चोरीबाबत भाष्य करणार का?

ज्या तत्परतेने कारखाने एआय तंत्रज्ञानासाठी झटत आहेत. त्याच तत्परतेने काटामारी व रिकव्हरी चोरी थांबविल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अन्यथा रात्र दिवस रक्ताच पाणी करून पिकवायच आणि कारखानदारांनी शेतकऱ्यांना लुटायचे, हे आता चालणार नाही. साखर कारखान्यांच्या काटामारी व रिकव्हरी चोरीबाबत पवार काका-पुतण्यांनी कधी भाष्य केले नाही. जर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून काटामारी व रिकव्हरी चोरीवर आळा घालण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते तर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर अजून वाढला असता, असेही शेट्टी म्हणाले.

Web Title: Raju shetty has asked questions to ajit pawar and sharad pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Raju Shetti
  • Sharad Pawar
  • Sugarcane
  • Sugarcane Farmers

संबंधित बातम्या

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा
1

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

Maharashtra Politics : बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटही उतरणार? खासदार राऊतांच्या ‘या’ वक्तव्याने चर्चांना उधाण
2

Maharashtra Politics : बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटही उतरणार? खासदार राऊतांच्या ‘या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

NCP Merger Breaking: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी बड्या नेत्यांची गुप्त बैठक; पडद्यामागे घडामोडींना वेग
3

NCP Merger Breaking: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी बड्या नेत्यांची गुप्त बैठक; पडद्यामागे घडामोडींना वेग

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ
4

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.