Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : “अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं, गुहागर बायपासवर स्पीड ब्रेकर पाहीजेच”: स्थानिकांची मागणी

वारंवार होणाऱ्या अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं यासाठी चिपळूणमध्ये गुहागर बायपासवरील बावशेवाडी वळण धोकादायक बनले असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 13, 2025 | 12:52 PM
Ratnagiri News : “अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं, गुहागर बायपासवर स्पीड ब्रेकर पाहीजेच”: स्थानिकांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:
  •  अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं
  • गुहागर बायपासवर स्पीड ब्रेकर पाहीजेच, स्थानिकांची मागणी
  • प्रशासन दखल घेत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी
 

चिपळूण : राष्ट्रीय महामार्ग असो किंवा राज्य महामार्ग खड्ड्यांची समस्या कायमच आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे दिवसेंदिवस प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. सध्या चिपळूणमध्ये गुहागर बायपासवरील बावशेवाडी वळण धोकादायक बनले असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी महालक्ष्मी मित्र मंडळ, महालक्ष्मीनगर (खंड बायपास, चिपळूण) यांनी केली आहे.

या संदर्भात मंडळाच्या वतीने चिपळूणचे उपअभियंता यांना लेखी निवेदन देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सदर मागणीवर आम्ही गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहोत. सहा महिन्यांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करूनही अद्याप स्पीड ब्रेकर बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजीचा सूर आळवला  आहे.”

मंडळाने यापूर्वीही उपअभियंता आणि शाखा अभियंता यांना समस्येविषयी माहिती देऊन वारंवार भेटी दिल्या होत्या. त्यावेळी तांत्रिक कारणास्तव जिल्हाधिकारी व पोलीस विभागाकडून परवानगी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, “सदर परवानगी घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असून तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे,” असे निवेदनात नमूद केले आहे.

बावशेवाडी येथे रस्त्याला दोन ठिकाणी टी-जॉइंट येतात तसेच वळण असल्याने वाहनांचा वेग वाढल्यास अपघाताची दाट शक्यता आहे. त्यामुळे तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनाची प्रत आमदार शेखर निकम यांच्यासह संबंधित लोकप्रतिनिधींना देण्यात आली आहे. सध्या लांबच्या पल्ल्या प्रवास जीवघेणा ठरत आहे, याचं कारण म्हणजे रस्त्यांवर असलेले खड्डे आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था. आतारपर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे ४५०० बळी गेल्याचं अहवालामध्ये सांगितलेलं आहे.  या सगळ्यावर काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी  रस्त्याची पाहणी केली होती. डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल असे सांगितले.

प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील सुनावणींची औपचारिकता पूर्ण; आता बदलाकडे लागले सर्वांचे लक्ष

 मात्र कोकणवासीयांचा सरकारच्या आश्वासनांवर विश्वास उरलेला नाही. प्रत्येक गणेशोत्सवाच्या तोंडावर दौरे, फोटोसेशन आणि गोड बोलांची परंपरा सुरू असते, पण वर्षभर प्रवास करणाऱ्या नागरिकांना अपघात, वाहतूक कोंडी आणि उपचारांच्या अभावामुळे मृत्यूचा धोका पत्करावा लागतो. अपूर्ण टप्पे तातडीने पूर्ण करण्याचा ठोस आराखडा कुठे आहे? कामातील विलंबाबद्दल ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली का? प्रत्येक टप्प्याचे पारदर्शक वेळापत्रक कधी जाहीर होणार? मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई का दिली जात नाही?

जनतेच्या ठाम मागण्याः प्रत्येक टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करून त्याचे पालन करावे. जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. मासिक प्रगती अहवाल प्रसिद्ध करावा. मृत्यूग्रस्त कुटुंबांना भरपाई द्यावी. गणेशोत्सवापूर्वी प्राथमिक टप्पे युद्धपातळीवर पूर्ण करावेत. कोकणवासीयांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे आश्वासनं नकोत, आता कृती हवी. फोटो नकोत, खड्डेविरहित सुरक्षित प्रवास हवा, अशी मागणी प्रवाशांकडून वारंवार केली जात आहे. 

Thane News : SRA योजनेत रहिवाशांची फसवणूक; तक्रारीनंतर अधिकाऱ्यांची खरडपट्टी

Web Title: Ratnagiri news accident season should be reduced speed breakers must be seen on guhagar bypass demand of locals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • Accident Case
  • Chiplun
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Chiplun BJP candidate : चिपळूण भाजप उमेदवाराच्या विजयाची सर्वत्र चर्चा; केवळ एका मताने मारली बाजी
1

Chiplun BJP candidate : चिपळूण भाजप उमेदवाराच्या विजयाची सर्वत्र चर्चा; केवळ एका मताने मारली बाजी

Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल
2

Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Ratnagiri News : कोयना जलविद्युत प्रकल्प गळतीमुळे पुरवठा बंद ; गावकऱ्यांना नाहक त्रास
3

Ratnagiri News : कोयना जलविद्युत प्रकल्प गळतीमुळे पुरवठा बंद ; गावकऱ्यांना नाहक त्रास

Indoli Accident: तरुण कामगाराचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू; इंदोलीत ग्रामस्थांचा संताप, ८ तास ‘चक्काजाम’!
4

Indoli Accident: तरुण कामगाराचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू; इंदोलीत ग्रामस्थांचा संताप, ८ तास ‘चक्काजाम’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.