Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSS On Nagpur Violence: ‘औरंगजेबाचा मुद्दा…’; नागपूरच्या हिंसाचारानंतर संघाने स्पष्ट केली आपली भूमिका

नागुपरात औरंगजेबाची कबर हटवण्यावरून प्रचंड राडा झाल्याचे पाहिला मिळाले. या सर्व परिस्थितीवर पोलिस यंत्रणांनी कडक कारवाई करत वातावरण शांत केले. या झालेल्या जाळपोळीनंतर नागपुरात मंगळवारी तणावपूर्ण शांततेचे वातावरण दिसले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 19, 2025 | 02:50 PM
RSS On Nagpur Violence: ‘औरंगजेबाचा मुद्दा…’; नागपूरच्या हिंसाचारानंतर संघाने स्पष्ट केली आपली भूमिका
Follow Us
Close
Follow Us:

सोमवारी संध्याकाळी ७.३० वाजता महाराष्ट्रातील नागपूरमधील महाल परिसरात हिंसाचार उसळला ज्यामध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विहिंपच्या आंदोलनादरम्यान एका समुदायाचे धार्मिक ग्रंथ जाळण्यात आल्याची अफवा परिसरात पसरली.  दरम्यान नागपूर येथे झालेला हिंसाचार आणि औरंजगेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नागुपरात औरंगजेबाची कबर हटवण्यावरून प्रचंड राडा झाल्याचे पाहिला मिळाले. या सर्व परिस्थितीवर पोलिस यंत्रणांनी कडक कारवाई करत वातावरण शांत केले. या झालेल्या जाळपोळीनंतर नागपुरात मंगळवारी तणावपूर्ण शांततेचे वातावरण दिसून आले. असे जरी असले तरी प्रशासनाकडून नागपुरात संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. इतकेच नाहीतर अनेक शाळांना सुट्टीही जाहीर केली गेली.

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड अखेर समोर, कोणाच्या आदेशावरून जमावाने पोलिसांवर हल्ला केला?

नेमके घडले काय होते? 

नागपूर शहरात १७ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता महाल परिसरात औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी काही संघटनांनी गवताच्या पेंड्यांची प्रतीकात्मक कबर काढून आंदोलन केले. याबाबत गणेश पेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मात्र या आंदोलनाबाबत अफवा पसरली व काही समाज घटकांनी हंसापुरी भागात जमाव करीत हिंसक आंदोलन केले. या भागात १२ दुचाकी जाळण्यात आल्या. तसेच भालदापूर भागात दोन जेसीबी, क्रेन आणि चारचाकी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. येथे दगडफेकही करण्यात आली. या संपूर्ण घटनांमध्ये ३३ पोलीस जखमी झाले असून पाच नागरिक जखमी झाले आहेत. यापैकी तीन नागरिकांना उपचाराअंती सोडण्यात आले, तर दोन नागरिकांवर उपचार सुरू आहेत. तसेच पोलिस उपायुक्त दर्जाचे तीन अधिकारीही जखमी झाले आहेत. यामध्ये एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने मारहाण झाल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय?

नागपूरमध्ये ही हिंसा झाली, त्यावर संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही हिंसेचे समर्थन करत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली आहे. बंगळुरूमध्ये लवकरच संघाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू होणार आहे.

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड अखेर समोर, कोणाच्या आदेशावरून जमावाने पोलिसांवर हल्ला केला?

नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड अखेर समोर

नागपूरमधील गणेशपेठ पोलिस ठाण्यात दंगलखोरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये या घटनेचा सूत्रधार उघड झाला आहे. एफआयआरनुसार, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चे शहर अध्यक्ष फहीम शमीम खान याच्या नेतृत्वाखाली ५० ते ६० लोकांनी बेकायदेशीरपणे पोलिस स्टेशनमध्ये गर्दी जमवली.यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लोकांनी गांधी गेटजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. औरंगजेबाच्या समाधीविरुद्ध घोषणाबाजी केली आणि औरंगजेबाचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. फहीम शमीम याच्या नेतृत्वाखाली या विरोधात लोकांचा जमाव जमला असल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: Rss sunil ambekar said aurangzeb not relevant issue after nagpur voilence crime maharashtra government marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 02:46 PM

Topics:  

  • crime news
  • Maharashtra Government
  • Nagpur Violence
  • RSS

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
2

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
3

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
4

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.