Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईच्या तीव्र झळा; 291 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा

जिल्ह्यामध्ये माण तालुक्यात 42 गावे व 291 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. तसेच पुढील 50 दिवसांचा आराखडा प्रशासनाने सक्रिय केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 17, 2025 | 03:16 PM
सातारा जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईच्या तीव्र झळा

सातारा जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईच्या तीव्र झळा

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा जिल्ह्यातील मोठ्या व लघु, मध्यम बंधारा प्रकल्पांमध्ये तब्बल 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तरीसुद्धा जिल्ह्याच्या पूर्व भागाला पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यामध्ये माण तालुक्यात 42 गावे व 291 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. तसेच पुढील 50 दिवसांचा आराखडा प्रशासनाने सक्रिय केला आहे.

शासकीय पाच आणि खाजगी 42 अशा 47 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, मान तालुक्यामध्ये 18 तर खटाव तालुक्यामध्ये 24 टँकरचे नियोजन करण्यात आले आहे. पाटण तालुक्यात एक गाव व चार वाड्यांना चार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर 1586 लोकसंख्या व नऊशे पशुधन अवलंबून आहे. वाई तालुक्यात एक गाव, तीन वाड्या कोरेगाव तालुक्यात 11 टँकरचा पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यात भूजल पातळीत घट झाल्याने ग्रामीण भागात काही गावात दोन दिवसात पाणी तर काही गावात आठवड्यातून एकदा नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

सातारा जिल्ह्यातील 28 विहिरी आणि 11 बोअरवेल अधिग्रहित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यामध्ये 41% पाणीपुरवठा शिल्लक असला तरी आगामी उन्हाळ्याची तीव्रता आणि मान्सूनची स्थिती लक्षात घेता काही ठिकाणी पाण्याची दिवसान आवर्तने सोडण्याचे निर्देश आहेत. जिल्हा प्रशासनाने तहसीलदार व प्रांत यांना विभागवार बैठका घेऊन पाणीपुरवठा करण्याचे नियोजन निर्देशित केले आहे .

माण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक 42 गावे व 291 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल जाणवू लागली होती. माण तालुक्याच्या बहुतांश भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्यावर प्रशासनाने 42 गावे व 291 वाड्यांमध्ये टँकरचा पाणीपुरवठा सुरू केला आहे. या पाण्यावर 65152 लोकसंख्या आणि 40270 पशुधन अवलंबून आहे. खटाव तालुक्यामध्ये सध्या पाणी स्थिती समाधानकारक असली तरी आगामी उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता गरजेनुसार 11 टँकरचा पाणीपुरवठा ‘स्टॅन्ड बाय मोड’वर उभा करण्यात आला आहे. त्यातील पाच टँकर सध्या सक्रिय आहेत.

हवामानशास्त्र विभागाकडून मान्सूनची सुखद वार्ता

यावर्षी हवामानशास्त्र विभागाने 103 टक्के मान्सूनची सुखद वार्ता दिली आहे. तरीसुद्धा सातारा जिल्ह्यात पाटणचा डोंगरी भाग तसेच सातारा तालुक्यातील विशेषता कास पठार परिसरातील गावे ही तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. सातारा तालुक्यातील उरमोडीचे पात्र सध्या आवर्तन नसल्यामुळे कोरडे पडले असून, उरमोडीच्या काठावरील गावांना सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. या संदर्भात प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Severe water shortage in satara district water supply through tankers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • Satara News
  • Water Shortage
  • Water supply

संबंधित बातम्या

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला
1

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब
2

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा
3

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा

कबुतरांचा सहवास देतोय खोकला अन् दमा; फुफुसाच्या संसर्गित रोगांना मिळतंय आवताण
4

कबुतरांचा सहवास देतोय खोकला अन् दमा; फुफुसाच्या संसर्गित रोगांना मिळतंय आवताण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.