Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar : जगात क्रांती होत आहे, पण…; शरद पवारांनी व्यक्त केली खंत

भटक्या विमुक्त समाजाला त्यांच्या अधिकारासाठी, शिक्षणासाठी लढावे लागत आहे आणि हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे, यासारखे दुर्दैवी दुसरे काही नाही, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 11, 2025 | 12:50 PM
Sharad Pawar : जगात क्रांती होत आहे, पण…; शरद पवारांनी व्यक्त केली खंत
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : आज जगात क्रांती होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे असे असताना दुसरीकडे भटक्या विमुक्त समाजाला त्यांच्या अधिकारासाठी, शिक्षणासाठी लढावे लागत आहे आणि हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे, यासारखे दुर्दैवी दुसरे काही नाही, अशी खंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. भारतीय भटके विमुक्त विकास संशोधन संस्था आणि फुले आंबेडकर साहित्य पंचायतन यांच्या वतीने शुक्रवारी जकातवाडी येथे शारदाश्रमच्या प्रांगणात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुप्रिया सुळे, संस्थेचे कार्याध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने, नारायण जावलीकर, रामभाऊ जाधव व संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

चळवळ अखंडपणे सुरू राहिली पाहिजे

पवार म्हणाले, माने यांनी पुरोगामी विचार रुजवण्यासाठी आयुष्याचा मोठा काळ खर्ची घातला. भटक्या विमुक्तांसाठी त्यांनी सुरू केलेल्या संस्थेला माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी प्रोत्साहन दिले. या संस्थेला या पुढील काळातही सर्वतोपदी सहकार्य केले जाईल. मात्र आजच्या आधुनिक युगामध्ये अजूनही भटका विमुक्त जमातींचा संघर्ष संपलेला नाही हे दुर्दैवी आहे. याकरिता ही चळवळ वेगवेगळ्या माध्यमातून अखंडपणे सुरू राहिली पाहिजे आणि शोषित वंचितांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन झाले पाहिजे.

साहित्यिक, कार्यकर्त्यांना पुरस्कार देण्याची परंपरा

कार्याध्यक्ष लक्ष्मण माने म्हणाले, फुले आंबेडकर विचारधारेला अनुसरून परिवर्तनाच्या चळवळीत योगदान देणारे लेखक साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देण्याची परंपरा संस्थेने जपली आहे. ही संस्था शून्यातून उभी राहिली आहे. संस्था उभी करण्यामध्ये शरद पवार यांचे योगदान अमूल्य आहे. संस्थेच्या छत्रछायेखाली आजवर पन्नास हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिकून बाहेर पडले. पवार यांनी आम्हाला इतकं भरभरून दिले आहे की आता आम्हाला त्यांच्याकडून काही नको श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर राहू असेही ते म्हणाले.

रामभाऊ जाधव यांचा ‘जीवनगौरव’ने सन्मान

यंदाचा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार अर्थशास्त्रज्ञ शिक्षण डॉ. सुखदेव थोरात यांना वैचारिक चळवळीतील लेखक नारायण जावलीकर यांना यल्लाप्पा वैदू स्मृती युवा साहित्य पुरस्कार व भटक्या विमुक्त चळवळीत काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ जाधव यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शरद पवार यांच्या हस्ते त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Sharad pawar expressed regret that the nomadic community is having to fight for their rights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • Cmomaharasahtra
  • NCP president Sharad Pawar
  • Satara News
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?
1

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

मंत्री शंभूराज देसाई अनवाणी पोहचले शेतकऱ्यांच्या बांध्यावर; माणमधील आपत्तीग्रस्तांना मिळाला दिलासा
2

मंत्री शंभूराज देसाई अनवाणी पोहचले शेतकऱ्यांच्या बांध्यावर; माणमधील आपत्तीग्रस्तांना मिळाला दिलासा

‘पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार’; धरणग्रस्तांच्या बैठकीत इशारा
3

‘पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार’; धरणग्रस्तांच्या बैठकीत इशारा

Satara News : नुकसानग्रस्त भागांत पालकमंत्र्यांनी दिली भेट; पंचनामे करुन भरपाई देण्याचे थेट दिले आदेश
4

Satara News : नुकसानग्रस्त भागांत पालकमंत्र्यांनी दिली भेट; पंचनामे करुन भरपाई देण्याचे थेट दिले आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.