
विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर येत असतानाच, आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील आज सायंकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा गोपनीय दौरा आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा दिल्ली प्रवास यामुळे राज्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक निवडणुकानंतर आता विधान परिषदांच्या निवडणुकीकडे लागले लक्ष; अनेक रिक्त पदांवर निवड होणार
मुख्यंमत्री फडणवीस यांच्या गु्प्त दिल्ली दौऱ्यानंतर आज रात्री सुनेत्रा पवार यादेखील दिल्लीला रवाना होणार आहेत. आज सायंकाळी 6.45 ला दिल्लीला रवाना होतील. (Sunetra Pawar Delhi) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या (११ फेब्रुवारी) दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र आणि गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीचा गुप्त दौरा केल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या दिल्ली दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हेदेखील सोबत असतील. (NCP Politics)
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या निकालात भारतीय जनता पक्ष २३३ जागांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने १६७ जागा जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १६२ जागांवर विजय मिळवला असून, महायुतीने एकूण ७३१ पैकी ५६२ जागांवर आपला झेंडा फडकावला आहे.
स्थानिक निवडणुकानंतर आता विधान परिषदांच्या निवडणुकीकडे लागले लक्ष; अनेक रिक्त पदांवर निवड होणार
दुसरीकडे, महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसला ५६, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ४३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना केवळ २६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीनंतर आता ग्रामीण भागातही महायुतीने आपली पकड मजबूत केल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.