
वाई पोलिसांच्या वतीने प्रत्येक चौकात वाहनांचे पार्किंग केल्यास गाडीचा नंबर पुकारण्यात येवून गाड्यांवर कारवाई केली जात होती, तेही बंद करण्यात आल्याने गाड्या कुठेही पार्किंग केल्या जात आहेत. व पोलीस प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा तुटवडा असल्याने वाई तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले जात असून वाईत श्वास गुदमरतोय अशी परिस्थिती झालीआहे. वाई शहरातील मुख्य रस्त्यांवर व – शहराच्या मुख्य चौकात या बाबी प्रामुख्याने ते जैन मंदीर, किसनवीर चौक ते सरकान दवाखाना, बावधन नाका ते विराटनग पर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दोन्ह बाजूला फळविक्रेते, व इतर दुकानदारांन फुटपाथवरच आपला ठिय्या मांडून धंव करीत आहेत. त्याचबरोबर मुख्य रस्त्यांव रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दुचाकी उभ्य असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शहरासह उपनगरात सुध्व दुकानदारांचे नावाचे बोर्ड व जाहिरा फलक हे रस्त्यावर ठेवल्याने नागरिकांन चालताना जीवमुठीत घेवून चालावे लागले मालांनी भरलेली वाहने कधीही कोठेह माल उतरविण्यासाठी उभी असतात त्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतो. याचा नाहक सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतूक शिस्त व पार्किंगचा दिसतोय अभाव
गल्लीतील सोसायटींच्या समोर स्वतःचे पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जातायत. त्यामुळे पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणी वाईकर नागरिकांमधून करण्यात येत आहे. अतिक्रमणासह सध्या वाई शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच सध्या नवीन पुलावर गाड्या मोठ्या प्रमाणात पार्किंग होत असल्याने वाहतुकीला कसलीही शिस्तच राहिली नाही. पोलिसांचे दुर्लक्ष तुटपंजा पोलीस फौज फाटा पोलीस अधीक्षकांचे वाई शहरावर नसलेलं लक्ष त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न आणखीनच गंभीर बनला आहे. तसेच निवडणुका चालू झाल्याने कुठल्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलेले नाही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत, अनेक ठिकाणी पालिकेने जागा नियोजित केल्या परंतु त्याठिकाणी कुठल्याही प्रकारच्या उपाय योजना करण्यात आल्या नाहीत.
रस्ता बसस्थानकासमोर रुंदीकरण होऊनही कुचकामी
वाई एसटी बसस्थानकासमोर वाहतुकीची होणारी कोडी टाळण्यासाठी बांधकाम विभागाने चौपदरीकरण करून रस्ता रुंद केला. परंतु बसस्थानका समोर असणाऱ्या हॉटेल्स व इतर दुकानदारांमुळे पाचगणी महाबळेश्वरला जाणारे पर्यटक रस्त्यावर गाडी उभी करून खरेदी करतात. सर्व वाहने रस्त्यावरच उभी असतात. त्यामुळे रस्ता रुंद होवूनही कुचकामी ठरला आहे. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करावी लागणार असून त्यासाठी जागा उपलब्ध करावी लागणार आहे.