Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवभोजन केंद्रसंचालकांचे दीड कोटी थकले; योजना चालवण्यासाठी करावी लागते तारेवरची कसरत

जिल्ह्यात अनेक शिवभोजन केंद्रांवरून दररोज थाळ्यांचे वाटप केले जाते. जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांसाठी दररोज ठराविक थाळ्या मंजूर आहेत. यासाठी महिन्याला अनुदान शासनाला द्यावे लागते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 07, 2025 | 03:47 PM
शिवभोजन केंद्रसंचालकांचे दीड कोटी थकले; योजना चालवण्यासाठी करावी लागते तारेवरची कसरत

शिवभोजन केंद्रसंचालकांचे दीड कोटी थकले; योजना चालवण्यासाठी करावी लागते तारेवरची कसरत

Follow Us
Follow Us:

अकोला : कोरोना काळात गरीब व गरजूंसाठी केवळ 10 रुपयांत भरपेट जेवण देणारी शिवभोजन योजना जिल्ह्यात सुरळीत सुरू आहे. मात्र, शासनाने गेल्या 5 महिन्यांपासून जिल्ह्यातील केंद्रचालकांचे सुमारे दीड कोटींचे बिल थकवले आहे. त्यामुळे ही योजना चालवण्याची तारेवरची कसरत केंद्र संचालक करत आहेत.

जिल्ह्यात अनेक शिवभोजन केंद्रांवरून दररोज थाळ्यांचे वाटप केले जाते. जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांसाठी दररोज ठराविक थाळ्या मंजूर आहेत. यासाठी महिन्याला अनुदान शासनाला द्यावे लागते. परंतु, अनेकदा हे अनुदान थकते. शिवभोजन थाळी केवळ १० रुपयांना मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती, श्रमिक, कामगार वर्ग, विद्यार्थी, वृद्ध नागरिक आदींची यामुळे एक एकवेळ जेवणाची सोय होते. या थाळीमध्ये २ पोळ्या, १ भाजी, १ वाटी भात, १ वाटी आमटी, वरण उपलब्ध करून देण्यात येते. नगर शहरात काही केंद्रांवर तर चक्क मोफतही थाळी दिली जाते.

बरेच दिवस मागणी करून कसे तरी ३१ मार्चपर्यंतचे अनुदान वाटप झाले. परंतु आता एप्रिल, मे, जून, जुलै व ऑगस्ट अशा पाच महिन्यांचे अनुदान मिळालेले नाही. शासन निर्णयानुसार केंद्रचालकांना १५ दिवसांत अनुदान वाटप करण्याची तरतूद आहे. परंतु, शासनाकडून सातत्याने सहा-सहा महिन्यांचे अनुदान थकविले जात असल्याच्या तक्रारी केंद्र चालकांकडून केल्या जात आहेत. शिवभोजन केंद्रांची ग्रामीण आणि शहर अशी वर्गवारी करण्यात आली आहे.

शिवभोजन केंद्रांना 25 रुपये अनुदान

शासनाकडून ग्रामीण भागातील शिवभोजन केंद्रांना २५ रुपये अनुदान दिले जाते, तर शहरी भागातील केंद्रांना प्रतिथाळी ४० रुपये दिले जातात. शिवभोजन केंद्रावर १० रुपयांत गरजू लोकांना भरपेट जेवण दिले जाते. थकलेले अनुदानासाठी शिवभोजन केंद्र संचालकांकडून अनुदान देण्याची मागणी जोर धरत आहे.

Web Title: Shiv bhojan center director has waiting rs 15 crore for shiv bhojan thali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • Maharashtra Government Scheme
  • maharashtra news

संबंधित बातम्या

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली
1

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात
2

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात

Farmers Loan Waiver: ५६ लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मोठा निर्णय
3

Farmers Loan Waiver: ५६ लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मोठा निर्णय

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून होणार सुरु; अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर होणार चर्चा
4

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून होणार सुरु; अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर होणार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.