Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Poison Issue : इचलकरंजीत सध्या परिस्थिती नियंत्रणात; आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर यांची माहिती

काही संबंधित रुग्णावर गावातीलच शाळा, सांस्कृतिक हॉल या ठिकाणी उपचार करण्यात आले. तर इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णावर उपचार सुरू होते. तर काही रुग्ण अतिदक्षता विभागात होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2025 | 12:52 PM
जलजीरा प्राशनाने ७ मुलींना विषबाधा

जलजीरा प्राशनाने ७ मुलींना विषबाधा

Follow Us
Close
Follow Us:

इचलकरंजी : जिल्ह्यातील शिवनाकवाडी येथील यात्रेतील महाप्रसादातून सुमारे 200 जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. त्यानंतर जिल्हा प्रशासन हादरून गेले होते. दरम्यान, गुरुवारी परिस्थिती नियंत्रणात आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आयजीएम रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.

हेदेखील वाचा : Ladki Bahin Yojana : एका महिन्यात तब्बल 5 लाख लाडक्या बहिणी झाल्या योजनेतून बाद; संजय राऊतांचा घणाघात

काही संबंधित रुग्णांवर गावातीलच शाळा, सांस्कृतिक हॉल या ठिकाणी उपचार करण्यात आले. तर इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णावर उपचार सुरू होते. तर काही रुग्ण अतिदक्षता विभागात होते. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आरोग्य विभागाने तातडीने पावले गतिमान करत रुग्णांवर तातडीने उपचार केल्याने गुरुवारी गावातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. नवीन रुग्ण सापडले नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर यांनी दिली. येत्या दोन दिवसात सर्व रुग्ण बरे होतील, असा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

भेसळ खव्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय

शिवनाकवाडी येथे यात्रेत विषबाधेची मोठी घटना समोर आली आहे. यात्रेत महाप्रसाद किंवा स्टॉलवरील अन्न सेवन केल्यानंतर शेकडो नागरिकांना त्रास झाला तर काही जणांची प्रकृती गंभीर होती. मात्र, विषबाधेची घटना महाप्रसादातील भेसळ खव्यामुळे झाल्याची चर्चा दिवसभर सुरु होती. सदरचा खवा कोणत्या व्यापाऱ्याकडून आणला याबाबत माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे समजते.

याबाबत अन्न औषध प्रशासन अधिकारी महेश मासाळ यांच्याशी चर्चा केली असता, ते म्हणाले खिरीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, अहवाल प्राप्त झाल्यानंतर कशामुळे विषबाधा झाली हे नक्कीच स्पष्ट होईल. त्यानुसार संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेकडो जणांना विषबाधा

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवनाकवाडी येथे ग्रामदैवत श्री कल्याणताई मातेच्या यात्रेत महाप्रसाद किंवा स्टॉलवरील अन्नातून शेकडो जणांना विषबाधा झाल्याचे दिसून आले. उलटी, मळमळ सुरू झाल्याने 187 रुग्णांना तत्काळ इचलकरंजी येथील आयजी रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगणात आले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

हेदेखील वाचा : Kolhapur News : माजी आमदारासोबतचा वाद आयुक्तांना महागात पडला; राज्य सरकारने प्रशासकपदाचा कार्यभारच काढून घेतला

Web Title: Situation in ichalkaranji is currently under control says pandurang khatavkar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 12:52 PM

Topics:  

  • food poisoning news

संबंधित बातम्या

जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा; मुख्याध्यापकांची कार्यतत्परता अन् वाचले मुलींचे प्राण
1

जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा; मुख्याध्यापकांची कार्यतत्परता अन् वाचले मुलींचे प्राण

झुरळांच्या शरीरावर वाढणाऱ्या ‘या’ जीवाणूमुळे शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान, दुर्लक्ष केल्यास अवयव होतील निकामी
2

झुरळांच्या शरीरावर वाढणाऱ्या ‘या’ जीवाणूमुळे शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान, दुर्लक्ष केल्यास अवयव होतील निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.