
Metro 14 Update: बदलापूर–कांजूरमार्ग मेट्रोला गती; ठाणे खाडीखालून धावणार भुयारी मार्ग
प्रवाशांना फायदा
प्रस्तावित मार्गामुळे बदलापूर, निळजे, घणसोली, महापे आणि शीळफाटा परिसरातील नागरिकांना भविष्यात अधिक सक्षम सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. वेगाने शहरीकरण होत असलेल्या या भागांतील प्रवाशांना याचा मोठा फायदा होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
पीपीपी तत्त्वावर प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न
यापूर्वी हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी अर्थात पीपीपी तत्त्वावर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तो पर्याय यशस्वी ठरला नाही. त्यामुळे आता अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) पद्धतीने प्रकल्प राबवण्याचा पर्याय पुढे आला आहे.
शीळफाटा ते कांजूरमार्ग आव्हानात्मक
या, प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता, संभाव्य प्रवासी संख्या आणि तांत्रिक शक्यता यांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी सल्लागार समिती नियुक्त करण्याची तयारी सुरू आहे. या समितीच्या अहवालानंतर अंतिम आराखडा निश्चित केला जाईल आणि पुढील निर्णय घेतले जातील. मेट्रो १४ प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास बदलापूर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या प्रवासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच पूर्व उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईदरम्यानची प्रवासी व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कसे होईल मेट्रो प्रकल्पाचे काम ?
सल्लागार निवडीची प्रक्रिया सुरू
मेट्रो १४ मार्गिकेच्या प्रकल्पाच्या कामासाठी तयार करण्यात आलेला आर्थिक सुसाध्यता अहवाल, सविस्तर प्रकल्प अहवाल आणि प्रवासी संख्येचा अंदाजाचा नव्याने अभ्यास करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्याला आधीच्या अहवालातील त्रुटी तपासून, तसेच नव्या शक्यतांची पडताळणी करावी लागणार आहे, या सल्लागाराच्या नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती अधिकाऱ्याऱ्यांनी दिली. कांजूरमार्ग जोडणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार मेट्रो १४ मार्गिकेची कांजूरमार्गला जोडणी देण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे ते म्हणाले.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)