Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून सुरू होणार अकरावी प्रवेश प्रक्रिया

दहावीचा निकाल १३ मे ला  जाहीर झाला आहे.या वर्षी अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी १९ ते २८ मे या कालावधीत  नोंदणी करावी.असे शिक्षण संचालक मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 16, 2025 | 07:52 PM
10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून सुरू होणार अकरावी प्रवेश प्रक्रिया
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  शैक्षणिक वर्षापासून राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार असून, यासाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या अगोदर अकरावीसाठी एक बनावट संकेतस्थळ कार्यरत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्यता होती.   https://mahafyjcadmissions.in/ या नवीन संकेतस्थळाच्या माध्यमातून १५ मेपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी करणे अपेक्षीत होते. ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी झाली नाही, त्यांना शेवटचा  एक दिवस (१६ मे ) वाढवून देण्यात आला होता.नवे संकेतस्थळ ९ मेपासून कार्यान्वित करण्यात आले आहे.

दहावीचा निकाल १३ मे ला  जाहीर झाला आहे.या वर्षी अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी १९ ते २८ मे या कालावधीत  नोंदणी करावी.असे शिक्षण संचालक मंडळाकडून सांगण्यात आले आहे.  गेल्यावर्षीपर्यंत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या पाच विभागांतील अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात होती.र्वरित राज्यात पारंपरिक पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावरच प्रवेश देण्यात येत होते. मात्र, येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्वत्रच अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साधारण १५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी होणे अपेक्षित आहे.नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर डमी राऊंड घेतला जाईल. त्यानंतर क्रमाने चार फेऱ्या होणार आहेत. विद्यार्थ्यांना निवड यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल असेही संचालक मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया केल्याचे फायदे

 

१) सुलभता:

विद्यार्थी कुठेही आणि केव्हाही अर्ज करू शकतात – फक्त इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक.

२)पारदर्शकता:

प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असल्यामुळे कोणताही पक्षपात किंवा गैरव्यवहार टाळता येतो.

३)वेळ आणि खर्च वाचतो

कॉलेजमध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही. प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचतो.

४)प्रणालीद्वारे मार्गदर्शन:

वेबसाइटमध्ये आवश्यक माहिती, सूचना आणि सुधारणा वेळोवेळी मिळतात.

५) स्वतःची प्राधान्यक्रम निवड:

विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार कॉलेज निवडू शकतात आणि बदलही करू शकतात.

६)दस्तऐवज अपलोड सुलभ

मूळ कागदपत्रांची फोटोकॉपी घेऊन जाण्याची गरज नाही – स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करता येतात.

७)एकाच पोर्टलवर सर्व माहिती

एकाच ठिकाणी अर्ज, कॉलेज माहिती, वेळापत्रक, फेऱ्यांचे निकाल – सर्वकाही उपलब्ध असते.

८) आपोआप गुणवत्ता यादी

 

गुणांनुसार प्रवेश निश्चित केला जातो – त्यामुळे निकोप स्पर्धा आणि न्याय्य संधी मिळते.

 नोंदणीसाठीची कार्यपद्धती आणि नियमावली शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ऑफलाइन पद्धतीने करण्यात आलेली कोणतीही प्रवेश प्रक्रिया वैध मानली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Web Title: The 11th admission registration process will begin from may 19 education marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 07:52 PM

Topics:  

  • education
  • education news
  • SSC Result

संबंधित बातम्या

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया
1

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया

शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश! आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक ज्ञान येणार शिकता
2

शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश! आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक ज्ञान येणार शिकता

शिक्षक एक अन् विद्यार्थी 60; अमरावतीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा
3

शिक्षक एक अन् विद्यार्थी 60; अमरावतीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा

मंदिर व्यवस्थापनातील नवी पिढी तयार करण्यासाठी वीस्कूल सज्ज! दुसऱ्या बॅचसाठी प्रवेश जाहीर
4

मंदिर व्यवस्थापनातील नवी पिढी तयार करण्यासाठी वीस्कूल सज्ज! दुसऱ्या बॅचसाठी प्रवेश जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.