Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्ध्यातील जिल्हा परिषदेच्या 82 शाळांत स्वच्छतागृहच नाही; 55 ठिकाणी स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीची गरज

जिल्ह्यात प्रथमच शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण राज्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या 82 शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी साधे स्वच्छतागृह नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 21, 2025 | 09:38 AM
55 ठिकाणी स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीची गरज

55 ठिकाणी स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीची गरज

Follow Us
Close
Follow Us:

वर्धा : नवीन शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून (दि. 23) सुरूवात होत आहे. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांचे शाळेत जल्लोषात स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने तयारीही करण्यात आली आहे. काही शाळांत लोकप्रतिनिधी तर काही शाळांत शासकीय अधिकारी विद्यार्थ्यांचे स्वागत करणार असले तरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 82 शाळांत स्वच्छतागृह नसल्याचे आणि 55 शाळांमधील स्वच्छतागृहांना दुरुस्तीची गरज असल्याचे वास्तव आहे.

सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी खुद्द पालकमंत्री तथा राज्याचे शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर नजीकच्या साटोडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उपस्थित राहून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. जिल्ह्यात प्रथमच शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण राज्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या 82 शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी साधे स्वच्छतागृह नाही. तर ज्या शाळांत स्वच्छतागृह आहे त्यापैकी 55 शाळांतील स्वच्छतागृहांची दैनावस्था झाली असून त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी ही स्वच्छतागृह दुरुस्त न झाल्यास विद्यार्थ्यांना गैरसोयीलाच सामोरे जावे लागणार आहे.

126 शाळांना सुरक्षा भिंत नाही

एकीकडे पाल्याचा प्रवेश कॉन्व्हेंटमध्ये करून घेण्याकडे पालकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. शाळा परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शाळेला सुरक्षा भिंत, शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असणे गरजेचे ठरते. पण जिल्ह्यातील तब्बल 126 शाळांना सुरक्षा भिंत नसल्याचे वास्तव आहे. उपाययोजना करण्याची गरज आहे.

केवळ 14 शाळांनी केली जलस्रोतांची तपासणी

डिसेंबर 2024 मध्ये दूषित पाण्यामुळे तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. त्यानंतर शिक्षण व आरोग्य विभागाच्या पुढाकाराने विशेष मोहीम राबवून 554 शाळांतील पाण्याचे नमुने घेत ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. याच तपासणीअंती 78 पाण्याचे नमुने दूषित आढळले होते.

Web Title: There are no toilets in 82 schools of zilla parishad in wardha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 09:38 AM

Topics:  

  • Educational News
  • wardha News

संबंधित बातम्या

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
1

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

Educational News: बंद शौचालये, अस्वच्छता, पाणी नाही…; देशातील शाळांचे धक्कादायक वास्तव  
2

Educational News: बंद शौचालये, अस्वच्छता, पाणी नाही…; देशातील शाळांचे धक्कादायक वास्तव  

Minority status to 75 schools: त्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा कुणी दिला? दुखवट्याच्या काळात घेतलेल्या निर्णयावर संशय बळावला
3

Minority status to 75 schools: त्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा कुणी दिला? दुखवट्याच्या काळात घेतलेल्या निर्णयावर संशय बळावला

Chandrapur News: चंद्रपुरमध्ये डिजिटल इंडिया दिवाळखोरीत! जिवतीतील ५० शाळांचा वीजपुरवठा खंडित केल्याने ई-लर्निंग साहित्य धूळखात
4

Chandrapur News: चंद्रपुरमध्ये डिजिटल इंडिया दिवाळखोरीत! जिवतीतील ५० शाळांचा वीजपुरवठा खंडित केल्याने ई-लर्निंग साहित्य धूळखात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.