वाठोडा परिसरात नर वाघाच्या हालचाली वाढल्याने वनविभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाला असून १० गावांतील नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Wardha News: जूननंतर जुलै महिन्यातही वर्धा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जलाशयांतील पाणीसाठा अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही. प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.
मार्की-झरी जामणी-अडकोली कोलमाइन्स प्रकल्पाबाबत पर्यावरणीय जनसुनावणीपूर्वी अनेक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. प्रकल्पामुळे शेती, जंगल, जलस्रोत आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे चौकशीची मागणी करण्यात…
वर्धा जिल्ह्यातील ५१ हजार वीज ग्राहकांकडे महावितरणची ₹१२.३२ कोटींची थकबाकी आहे. विशेष वसुली मोहिमेंतर्गत जुलै महिन्यात ६०० हून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून वेळेत बिल भरण्याचे आवाहन करण्यात…
पावसाळ्यात संसर्गजन्य पशुरोगांचा धोका टाळण्यासाठी वर्धा जिल्ह्यात 2.49 लाखांहून अधिक पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या विशेष मोहिमेमुळे लम्पी, घटसर्प, एकटांग्या आणि पीपीआरसारख्या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात यश आले…
वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित ₹4.50 कोटींच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी ठेवीदारांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेत माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीने भरपावसात महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करत NEET पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई आणि राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध केला. आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी…
वर्धा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 24.09 मिमी पावसाची नोंद झाली असून समुद्रपूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. हवामान विभागाने शुक्रवारीही यलो अलर्ट जारी केला आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा…
वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली असून चारही मतदारसंघांसाठी रस्ते व पुलांच्या कामांसाठी जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आता भूसंपादनाविषयी मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. सूचना प्राप्त होताच भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती येणार आहे. शक्तिपीठ महामार्ग हा १२ जिल्ह्यातील ३९ तालुके, ३७१ गावांच्या हद्दीतून जाणार आहे.
जागतिक एआय परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाने केलेल्या कथित कृत्याच्या निषेधार्थ वर्ध्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.
रस्त्यावर मित्रांसोबत बोलत असलेल्या व्यक्तीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना विक्रम शिलानगर येथे घडली असून, या प्रकरणी बुधवारी (दि. २६) तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपी उज्ज्वल हा कारागीर म्हणून मागील तीन वर्षांपासून काम करत होता. तो सराफा लाईनमधील दुकानारांकडून शुद्ध सोने घेऊन नागपूर येथे जाऊन दागिने बनवून आणत होता.
तन्मय भगत (रा. समतानगर) असे फिर्यादीचे नाव आहे. आयुष वावरे, आकाश उर्फ डुड्डू पुसदेकर, गौरव कैतवास आणि सौरव यादव उर्फ लाल्या अशी या प्रकरणातील आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गणेशोत्सवासोबतच महालक्ष्मी सणालाही सुरुवात होईल. त्यानिमित्त वर्ध्यात बाजारपेठेत गौरींच्या एकापेक्षा एक सुंदर, प्रसन्न, देखणे मुखवटे विक्रीसाठी आले आहेत.