Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे

ग्रामविकास विभागाच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यात उमेदअंतर्गत 14 कोटी रुपये थेट महिला बचत गटांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 16, 2025 | 03:03 PM
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामविकास विभागाने या वर्षापासून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसेच नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आमदार देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, सोलापूरच्या सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींच्या विमानसेवेच्या दीर्घकालीन मागणीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये “उडान” योजनेअंतर्गत व्हायाबिलिटी गॅप फडिंगची तरतुद करुन सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवा सुरु करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय सोलापूरच्या औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन सेवा क्षेत्राला नवी दिशा देणारा आहे.

तसेच ग्रामविकास विभागाच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यात उमेद अंतर्गत 14 कोटी रुपये थेट महिला बचत गटांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन जिल्ह्यात मोठया प्रमाणावर लखपती दीदी निर्माण होतील. श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी, अरण तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी १५० कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे भव्य स्मारक उभारणीसाठी शासनाची कृष्ण तलावाची जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली.

पंढरपूर शहरामध्ये आषाढी वारीच्या अनुषंगाने स्वच्छतेचे नवीन आयाम निश्चित केले. त्याच धर्तीवर स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हे अभियान आजपासून एक वर्षासाठी घोषीत करीत आहे. या अभियानामध्ये सर्व घटकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा. तसेच सोलापूर शहराच्या सन २०५७ पर्यंतच्या पाणी गरजांचा विचार करून महाराष्ट्र राज्य नगरोत्थान योजनेअंतर्गत ‘सोलापूर सिटी वॉटर सप्लाय स्कीमला’ शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

Web Title: Villages should be made self reliant by actively participating in the cm samruddh panchayat raj abhiyan says minister jaykumar gore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • Jaykumar Gore
  • maharashtra news
  • Solapur News

संबंधित बातम्या

Indian Railwayचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील गाड्यांना ‘ब्रेक’, तर उत्तर भारतासाठी विशेष गाड्यांचा पूर
1

Indian Railwayचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील गाड्यांना ‘ब्रेक’, तर उत्तर भारतासाठी विशेष गाड्यांचा पूर

पुढील वर्षी दहावीचे पेपर असणार पोलिस कस्टडीत; पेपर चोरीनंतर महत्त्वाचा निर्णय
2

पुढील वर्षी दहावीचे पेपर असणार पोलिस कस्टडीत; पेपर चोरीनंतर महत्त्वाचा निर्णय

Ahilyanagar News: रखडलेले रस्ते, पुलांच्या कामांना वेग येईल! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार आशुतोष काळेंना ग्वाही
3

Ahilyanagar News: रखडलेले रस्ते, पुलांच्या कामांना वेग येईल! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार आशुतोष काळेंना ग्वाही

कौशल्य विकासावर भर; रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा संपन्न, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या
4

कौशल्य विकासावर भर; रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा संपन्न, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.