
नगरकरांनो तुमच्या शहराची प्रतिमा मलीन होतेय!
शहरातील बुऱ्हाणनगर व भिंगार परिसरातून अहिल्यानगरकडे येणाऱ्या रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे. तसेच एमआयडीसीकडून शहरात प्रवेश करताना आणि महामार्गाच्या कडेलाही कचऱ्याचे ढीग दिसून येतात. परिणामी, शहरात येणाऱ्या नागरिकांना व पाहुण्यांना सुरुवातीलाच घाणीचे दर्शन घडते, ज्यामुळे अहिल्यानगरची स्वच्छ शहर म्हणून असलेली ओळख धोक्यात आली आहे.
Ahilyanagar News: नेवासात चाललंय तरी काय? उपनगराध्यक्षांसह 6 नगरसेवकांवर गुन्हा, जाणून घ्या प्रकरण
एकीकडे शहराला स्वच्छतेसाठी विविध पुरस्कार मिळत असताना, दुसरीकडे प्रवेशद्वारांवरच कचऱ्याचे ढीग दिसणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे गवते यांनी नमूद केले. हा कचरा तात्काळ उचलण्यात न आल्यास १४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारात प्रतिकात्मक स्वरूपात कचरा टाकून आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पर्यावरण संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील झाडांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे गवते यांनी सांगितले. झाडतोड थांबली नाही, तर भविष्यात मानवासह सर्व सजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. शासनाने या गंभीर प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाह रं मर्दा ! प्रतिकूल परिस्थितीत शेतीचं विक्रमी उत्पादन; ‘आरा’ द्राक्षांना परदेशात मागणी
जागतिक पर्यावरण विकास सरकार संघटनेच्या बैठकीत बोलताना गवते यांनी वाढत्या प्रदूषणावर तीव्र चिंता व्यक्त केली. “मुंबई, दिल्लीसह अनेक महानगरांमध्ये प्रदूषणाने भयंकर स्वरूप धारण केले आहे. स्वातंत्र्याच्या वेळी भारतात सुमारे ४२ टक्के वनक्षेत्र होते, आज ते केवळ ०.४ टक्क्यांवर आले आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे,” असे त्यांनी सांगितले.
शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे गायी, कुत्रे यांसारख्या प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक साचत असून त्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रदूषणातही मोठी वाढ झाली आहे. अहिल्यानगरच्या दर्शनी भागात असलेला हा कचरा जणू येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचे स्वागतच करत असल्याची उपरोधिक टीकाही गवते यांनी केली.