Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panvel Municipal Corporation: राष्ट्रवादीचा गड कोसळला; पनवेल महापालिकेत फुलले कमळ आणि धनुष्यबाण

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक निकालाला आठ दिवस उलटत नाहीत, तोच कळंबोलीत झालेल्या राजकीय परिवर्तनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड मानला जाणार इथे कमळ फुलला आहे. वाचा सविस्तर

  • By Priti Hingane
Updated On: Jan 26, 2026 | 09:53 AM
पनवेल पंचायत समितीवर भाजपचे कमळ; रंजना वास्कर सभापती, भूपेंद्र पाटील उपसभापती

पनवेल पंचायत समितीवर भाजपचे कमळ; रंजना वास्कर सभापती, भूपेंद्र पाटील उपसभापती

Follow Us
Follow Us:
  • कळंबोलीत महायुती 16 पैकी 16 जागांवर विजयी
  • माथाडी बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा
  • राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड असूनही एकही जागा जिंकता आली नाही
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक निकालाला आठ दिवस उलटत नाहीत, तोच कळंबोलीत झालेल्या राजकीय परिवर्तनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकेकाळी माथाडी कामगारांचा बालेकिल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या कळंबोलीत यंदा मतदारांनी पारंपरिक राजकीय समीकरणे मोडून काढत भाजप आणि महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. या निकालामुळे केवळ महाविकास आघाडीचा पराभव झाला असे नाही, तर माथाडी कामगारांचे प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव जगताप आणि शशिकांत शिंदे यांनाही अप्रत्यक्षपणे मतदारांनी नाकारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

कळंबोलीतील एकूण १६ पैकी तब्बल १६ जागांवर महायुतीने विजय मिळवला. भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे प्रत्येकी दोन नगरसेवक विजयी झाले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. ‘तुतारी’ चिन्हावरील उमेदवारांना तर भोपळाही फोडता आला नाही.

हेही वाचा: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इंदापूर प्रशासन सज्ज; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

या निकालातून केवळ महाविकास आघाडीच नव्हे, तर गुलाबराव जगताप आणि शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वालाही कळंबोलीकरांनी स्पष्ट नकार दिल्याचे बोलले जात आहे. प्रचारादरम्यान जगताप हे प्रत्यक्ष मैदानात उतरलेले दिसले नाहीत. महाविकास आघाडीने त्यांच्या बॅनर आणि फोटो लावले, मात्र ते प्रचार सभांसाठी आले नाहीत. फक्त शशिकांत शिंदे यांची एक सभा कळंबोलीत झाली. त्यामुळे जगताप हे तटस्थ राहिले का, की त्यांनी जाणीवपूर्वक अंतर ठेवले, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

कळंबोली आणि नवीन पनवेल हे पनवेल तालुक्यात सर्वात आधी विकसित झालेले भाग आहेत. येथे लोह-पोलाद मार्केट उभे राहिल्याने मोठ्या प्रमाणात माथाडी कामगारांची वस्ती निर्माण झाली. शरद पवार मुख्यमंत्री असताना माथाडी कामगारांना घरे देणे, माथाडी कामगार कायदा अस्तित्वात आणणे यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांतून आलेल्या माथाडी कामगारांची शरद पवार यांच्याशी दीर्घकाळ निष्ठा राहिली आणि कळंबोलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले.

या पार्श्वभूमीवर गुलाबराव जगताप यांनी अनेक वर्षे कळंबोलीतील माथाडी कामगारांचे नेतृत्व केले. हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँक, स्टील मार्केट कमिटीचे अध्यक्षपद आणि लोह-पोलाद मार्केटवरील त्यांचे वर्चस्व यामुळे कळंबोलीत’ जगताप म्हणजे राष्ट्रवादी’ असे समीकरण तयार झाले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनाही कळंबोलीत मानणारा मोठा वर्ग होता. २०१७ च्या निवडणुकीतही माथाडी कामगारांनी महाविकास आघाडीला स्पष्ट कौल दिला होता.

हेही वाचा: Dharashiv PWD Corruption: धाराशिवमध्ये भ्रष्टाचाराचा कळस; लाखोंचे रस्ते काही दिवसांतच उखडले

याशिवाय शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकेचे प्रभारी पद स्वतः कडेच ठेवले होते. तरीही कळंबोलीसह संपूर्ण पनवेल परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अपयश पत्करावे लागले.
त्यामुळे संघटनात्मक अपयश, स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव कमी होणे आणि बदलत्या मतदार मानसिकतेचा फटका पक्षाला बसल्याचे मानले जात आहे. एकूणच कळंबोलीतील हा निकाल म्हणजे केवळ सत्तांतर नाही, तर माथाडी कामगारांच्या राजकारणात झालेला मूलभूत बदल आहे. भाजपने पारंपरिक प्रभाव, करिष्मा आणि जुनी निष्ठा यांची गणिते मोडून काढत विकास, स्थैर्य आणि सत्तेच्या ताकदीचा नवा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आगामी काळात कळंबोलीचे राजकारण कोणत्या दिशेने जाईल आणि माथाडी नेतृत्व पुन्हा उभारी घेऊ शकते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Voters break traditional stronghold bjpmahayuti gains edge in panvel civic outcome

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • Panvel Municipal Corporation
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! 20 दिवसांत पर्यायी जलवाहिनीचे काम पूर्ण, शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत
1

Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! 20 दिवसांत पर्यायी जलवाहिनीचे काम पूर्ण, शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत

Raigad News: माथेरानला जाणार असाल तर ही बातमी आधी वाचा! रविवारी पहाटे 5 ते 8.30 वाजेपर्यंत घाटरस्ता बंद, पर्यटकांना मोठा फटका
2

Raigad News: माथेरानला जाणार असाल तर ही बातमी आधी वाचा! रविवारी पहाटे 5 ते 8.30 वाजेपर्यंत घाटरस्ता बंद, पर्यटकांना मोठा फटका

Raigad News: नेरळ साकव पुलाचे काम अर्धवट; सुरक्षा कठडे नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात, ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप
3

Raigad News: नेरळ साकव पुलाचे काम अर्धवट; सुरक्षा कठडे नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात, ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप

Raigad News: कर्जतमध्ये टोरंट पॉवर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध; जमिनी देण्यास नकार, ग्रामसभेत ठराव मंजूर
4

Raigad News: कर्जतमध्ये टोरंट पॉवर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध; जमिनी देण्यास नकार, ग्रामसभेत ठराव मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.