Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : भोसा बंधाऱ्याने बुडवला खरीप हंगाम, कचरा साचल्याने नदीचा प्रवाह ठप्प; शेकडो एकर पिके जलमय

समुद्रपूर तालुक्यातील भोसा (गौळ), उमरा आणि मार्डा परिसरात मुसळधार पावसानंतर बंधाऱ्यात कचरा अडकल्याने नदीचे पाणी शेतांमध्ये घुसले. यामुळे शेकडो एकरांवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 04, 2026 | 07:31 PM
wardha

wardha

Follow Us
Follow Us:

गाडेगाव, (वा.). समुद्रपूर तालुक्यातील भोसा (गौळ), उमरा, मार्डा व परिसरात झालेल्या मुसळधार पावसानंतर नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो एकरांवरील खरीप पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. भोसा (उमरा) शिवारातील नदीवरील बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात काडी-कचरा, झाडांच्या फांद्या आणि गाळ अडकल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे ठप्प होतो. परिणामी नदीचे पाणी थेट शेतांमध्ये शिरून सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि ज्वारीसह विविध खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले.

३० व ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर भोसा (गौळ), उमरा, मार्डा परिसरातील अनेक शेतांमध्ये पाणी साचून राहिले, अनेक दिवस पाणी न ओसरल्याने उभी पिके कुजून गेली असून शेतकऱ्यांचे संपूर्ण खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले आहे. बियाणे, उघड खते आणि औषधांवर झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे, ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या भोसा (गौळ) बंधाऱ्याच्या नियोजनातील त्रुटी यंदाच्या पावसात पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात नदीतील काडी कचरा व गाळ बंधाऱ्यात अडकल्याने पाण्याचा निचरा थांबतो आणि नदीचे पाणी मागे साचून थेट शेतांमध्ये घुसते. त्यामुळे दरवर्षी शेकडो एकर शेती जलमय होत असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे.

यापूर्वीही या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी विविध माध्यमातून आवाज उठविण्यात आला होता. बंधाऱ्यातील गेटची योग्य व्यवस्था करणे, नियमित गाळ व कचरा काढणे आणि पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी अनेक वर्षापासून करीत आहेत. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Wardha News : सेलूमध्ये रस्ता रुंदीकरणाचा बोजवारा; उघड्या नालीत पडल्या 2 म्हशी, कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे अपघात

कायमस्वरुपी उपाययोजना करा

पुरामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने आता रब्बी पिकांवरच अवलंबून राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या आधारे नुकसानभरपाई जाहीर करावी, तसेच भोसा (गौळ) बंधाऱ्याची तातडीने तांत्रिक पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोक आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी वर्गाने दिला आहे.

ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीमुळे अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाल्याने आता रब्बी पिकांवरच अवलंबून राहण्याची वेळ आल्याचे शेतकरी सांगत आहेत. भोसा (गौळ) येथील शेतकरी नीलेश गोस्वामी यांनी बंधाऱ्यालगतची त्यांची ३० एकर शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचे सांगत उत्पादन खर्चाच्या आधारे तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

Wardha News: वर्ध्यातील 14 धार्मिक स्थळांना तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा; पर्यटन व विकासाला मिळणार चालना

शेतकरी आणि ग्रामस्थांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्यासोबतच भोसा (गौळ) बंधाऱ्याची तांत्रिक पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: Wardha bhosa bandhara flood kharif crop damage farmers demand compensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Rain News
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : स्कूल व्हॅनला धडक ६ विद्यार्थी गंभीर, १५ जखमी; वर्धा-मदणी मार्गावरील करंजी-काजी परिसरातील घटना
1

Wardha News : स्कूल व्हॅनला धडक ६ विद्यार्थी गंभीर, १५ जखमी; वर्धा-मदणी मार्गावरील करंजी-काजी परिसरातील घटना

Wardha News: वर्ध्यातील 14 धार्मिक स्थळांना तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा; पर्यटन व विकासाला मिळणार चालना
2

Wardha News: वर्ध्यातील 14 धार्मिक स्थळांना तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा; पर्यटन व विकासाला मिळणार चालना

Wardha News : सेलूमध्ये रस्ता रुंदीकरणाचा बोजवारा; उघड्या नालीत पडल्या 2 म्हशी, कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे अपघात
3

Wardha News : सेलूमध्ये रस्ता रुंदीकरणाचा बोजवारा; उघड्या नालीत पडल्या 2 म्हशी, कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे अपघात

Wardha News : 153 जि.प. शाळांच्या इमारती धोकादायक; गळती छते, तडे गेलेल्या भिंतींमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
4

Wardha News : 153 जि.प. शाळांच्या इमारती धोकादायक; गळती छते, तडे गेलेल्या भिंतींमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.