Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात पाण्याचा तुटवडा; टँकरच्या अल्प फेऱ्यांमुळे नागरिकांना फटका

कोल्हापूर शहराला शुद्ध पाणी मिळावं यासाठी थेट काळमावाडी धरणातून पाणीपुरवठा योजना करण्यात आली. या योजनेचे धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले. पण पाणी योजना सुरू झाल्यापासून काही ना काही सतत बिघाड होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 30, 2025 | 03:43 PM
कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात पाण्याचा तुटवडा; टँकरच्या अल्प फेऱ्यांमुळे नागरिकांना फटका

कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात पाण्याचा तुटवडा; टँकरच्या अल्प फेऱ्यांमुळे नागरिकांना फटका

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : काळम्मावाडी फिल्टर हाऊस येथील पंप नादुरुस्त झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरात ऐन पावसाळ्याच्या दिवसात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा प्रयत्न केला. मात्र, टँकरच्या अल्प फेऱ्यांमुळे नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळाले. त्यामुळे अनेक ठिकाणी वादावादीचे प्रकार शनिवारी शहरात घडले.

कोल्हापूर शहराला शुद्ध पाणी मिळावं यासाठी थेट काळमावाडी धरणातून पाणीपुरवठा योजना करण्यात आली. या योजनेचे धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले. पण पाणी योजना सुरू झाल्यापासून काही ना काही सतत बिघाड होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी समस्याला सामोरे जावे लागत आहे. मागील दोन दिवसांपासून फिल्टर हाऊसमध्ये बिघाड झाल्याने शहरात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे एक लाईन सुरु असल्याने याद्वारे कोल्हापूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

पण वार्डमधील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा तर काही ठिकाणी पाणीच आले नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने टँकरच्याद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, नागरिकांची मागणी जास्त आणि पाणीपुरवठा कमी अशी गत झाल्याने अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले. तर टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या गाडी चालकांना तसेच सोबत असल्याने अधिकाऱ्यांना घेरावा घालून धारेवर धरण्यात आले.

फिल्टर हाऊसची दुरुस्ती करण्यासाठी अद्याप तंत्रज्ञान आले नसल्याने थेट पाईपलाईन योजनेच्या पंपाची दुरुस्ती झालेली नाही. कंपनीचे तंत्रज्ञ रविवारी येणार असून रात्रीपर्यंत दुरुस्ती झाली तर पाणी सुरळीत होईल, असा अंदाज महापालिकेने वर्तवला आहे. सायंकाळी शिंगणापूर योजना सुरू करण्याची नियोजन केले आहे. रविवारी सर्व भागात नियमित पाणीपुरवठा केला जाईल, असेही सांगितले आहे.

सध्या काळम्मावाडी थेट पॉईंट योजनेचे दोन पंपाद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याने गुरुवारपासून दिवसाआड पाणी देण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यातून काही फरक पडला नाही. वार्डमध्ये पाणी देण्यात येणार असे जाहीर केल्याने नागरिक निर्दास्त होते. पण काही काळ भागात पाणी कमी दाबाने तर अन्य भागात वेळेत पाणी आलेच नसल्याने त्यांची त्रेधातिरिपीट उडाली. पुन्हा टँकरसाठी फोन सुरू झाले. त्यातून टँकरच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात झाल्या टँकरमधून आणलेली पाणी भरून घेण्यासाठी मोठ्या पाईप लावल्या होत्या. त्यामुळे पाणी भरून घेण्यात अडचणी येत होत्या.

पैसे घेऊन काही ठिकाणी थेट घरात पाईपने पाणी

पैसे घेऊन काही ठिकाणी थेट घरात पाईप जोडून टाक्या भरण्याची प्रकार चालू होते. यामुळे टँकर मोफत की पैसे देऊन असा प्रश्न नागरिकांना पडला होता. पंपाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने सॉफ्टवेअर एबीबी या कंपनीला संपर्क केला असून, अद्याप कंपनीची इंजिनियर आलेली नाहीत. आल्यानंतरच काळम्मावाडीवर थेट जाऊन हॉलची देखभाल करणार आहेत.

Web Title: Water shortage in kolhapur during monsoon citizens suffer due to short tanker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Water Shortage

संबंधित बातम्या

शिरोलीत ऊसाच्या फडाला भीषण आग; 30 एकर ऊस जळून खाक, वेळीच खबरदारी घेतली म्हणून…
1

शिरोलीत ऊसाच्या फडाला भीषण आग; 30 एकर ऊस जळून खाक, वेळीच खबरदारी घेतली म्हणून…

Kolhapur News : शिवसेना कुणाच्याही दावणीला बांधायला शिवसेना कमजोर नाही-अरुण दुधवडकर
2

Kolhapur News : शिवसेना कुणाच्याही दावणीला बांधायला शिवसेना कमजोर नाही-अरुण दुधवडकर

खळबळजनक! थेट कोल्हापूरचे कलेक्टर ऑफिसच Bomb ने उडवण्याची धमकी; ईमेल येताच…
3

खळबळजनक! थेट कोल्हापूरचे कलेक्टर ऑफिसच Bomb ने उडवण्याची धमकी; ईमेल येताच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.