Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानातील उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापला, कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमानात मोठी वाढ झाली आहे. कारण पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मार्गे वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये वाढ झाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 23, 2024 | 11:34 AM
पाकिस्तानातील उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापला, कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागातील तापमान चांगलेच तापले आहे. अनेक ठिकाणी तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर गेले. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची काहीही होतेय. तर दुसरीकडे मुंबई आणि ठाणेकरांची अजून उष्णतेपासून सुटका मिळालेली नाही. तापमानाचा ताप या भागाती नागरिकांना करावा लागतो. त्यातच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या तापमानात मोठी वाढ झाली. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतो. पुढील काही दिवस या उष्णतेचा त्रास होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ताशी 35 ते 40 किमी वेगाने उष्ण वारे गुजरातमध्ये वाहत आहे. दक्षिणोत्तर हवेच्या निर्वात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वारे महाराष्ट्रात देखील येत आहे. परिणामी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकण, किनारपट्टी, सह्याद्री घाटमाथा, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचे संकेत देण्यात आली आहे.

उष्णता का वाढतेय?

मार्च ते मे या तीन महिन्यांच्या मान्सूनपूर्व गोंधळामुळे महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेनुसार वातावरणात बरेच बदल होत आहे. तसेच कोकणपट्टीच्या खाऱ्या समुद्राचा खारा वारा कोकणपट्टीतील अधिवासासाठी दररोज आदळतो. दिवसा आणि रात्री वाऱ्याची दिशा वेगळी असते. याचदरम्यान पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि राजस्थानच्या भागातून उच्च दाबाची प्रणाली झाली तर वायव्य दिशेकडून गुजरात, अरबी समुद्रावरुन वारे, उष्णता घेऊन मुंबईसह संपूर्ण कोकणात सह्याद्रीवर अडकून आदळतात. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर तसेच कोकणात जाणवणाऱ्या उष्णतेच्या लाट जाणवत आहे.

कुठे पाऊस तर कुठे उष्णता

एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. काही ठिकाणी घरांवरील पत्रेही उडून गेली आहेत. हवामान खात्याने गुरुवारपासून (२२ मे) पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Web Title: Weather forecasters warn pakistanis to stay indoors ahead of new heatwave and weather update in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2024 | 11:34 AM

Topics:  

  • heat wave
  • Heat Wave in Maharashtra

संबंधित बातम्या

नवतपाची होणार “या” दिवसापासून सुरवात; हे टिप्स करा फॉलो
1

नवतपाची होणार “या” दिवसापासून सुरवात; हे टिप्स करा फॉलो

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले ‘हे’ निर्देश
2

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले ‘हे’ निर्देश

Maharashtra Weather: गेल्या दहा वर्षातील यंदाचा एप्रिल सर्वाधिक ‘हॉट’; ४० अंशाच्या वर पोहोचले तापमान
3

Maharashtra Weather: गेल्या दहा वर्षातील यंदाचा एप्रिल सर्वाधिक ‘हॉट’; ४० अंशाच्या वर पोहोचले तापमान

मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उन्हाचा कडाका आणखी वाढणार; हवामान विभागाकडून ‘अलर्ट’ जारी
4

मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उन्हाचा कडाका आणखी वाढणार; हवामान विभागाकडून ‘अलर्ट’ जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.