हवामान विभाग दररोज हवेतील तापमानाची नोंद करतो; मात्र जमिनीवरील तापमान त्यापेक्षा अधिक असते. पुण्यात उन्हाळ्यात भूपृष्ठाचे तापमान हवेच्या तापमानापेक्षा चार ते आठ अंशांनी जास्त नोंदवले जाते.
द्रोणीय रेषेमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र वगळता अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, ढगाळ वातावरण असूनही उकाड्याची झळ कायम आहे.
दुपारच्या सुमारास कडक उन्हात काम सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या शेतातच कोसळल्या. सोबतच्या मजुरांनी त्यांना तातडीने शिनोली येथील खासगी दवाखान्यात दाखल केले.
जिल्ह्यात उष्माघात सदृश्य १२ रुग्ण दाखल झाले होते. त्यांच्यावर आवश्यक उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. खबरदारी म्हणून जिल्ह्यात तालुकानिहाय उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४३ अंशांवर गेला असून रुग्णालयांमध्ये डोकेदुखी आणि अशक्तपणाच्या रुग्णांची वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पाच चक्रीवादळे एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे हवामानाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. मैदानी प्रदेश तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेने होरपळत असताना, ईशान्य भारत आणि डोंगराळ प्रदेशात पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे.
रखरखत्या उन्हामुळे आणि वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दरम्यान वाढत्या उष्प्यामुळे शहरासह महामार्गावर सुध्दा दुपारी वाहनांची रहदारीच्या संख्येत कमालीची घट दिसत असल्याचे दिसते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ४१.४ अंश तापमानासह उन्हाचा तडाखा वाढला आहे. प्रशासनाने उष्माघात कक्ष सज्ज केले असून १७ एप्रिलला पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे. वाचा सविस्तर मार्गदर्शक सूचना.
Chhatrapati Sambhajinagar Temperature: मागील तीन दिवसांपासून कमाल तापमानात होत असलेली वाढ मंगळवारी देखील नोंदवण्यात आली. मंगळवार दि. १४ रोजी ४१. ४ अंश सेल्शियस कमाल तापमानाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे.
कडक उन्हामुळे तापमानात सातत्याने वाढ होत असून नागरिकांना उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टर कैलास पवार यांनी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे,
मालेगाव येथे तापमान ४१.४ अंशांवर पोहोचत हंगामातील उच्चांक नोंदवला गेला, तर नाशिक येथे ३९.५ अंश तापमान नोंदले गेले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
किमान तापमान देखील १९ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. त्यामुळे शहरातील उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. मात्र यामध्ये पुढील तीन ते चार दिवसांत मोठी घट होण्याची शक्यता आहे.
Mumbai Heatwave Alert News : मुंबई आणि एमएमआर प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच आहे. नागरिक देखील उष्णतेच्या लाटेने त्रस्त झाले असून मुंबईतील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते. मुंबईला हवामान विभागाने यासंदर्भात अलर्ट जारी केला असल्याचे म्हटले जात आहे.