Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पंतप्रधान मोदींनी भारताला जागतिक महासत्तेकडे…” ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ प्रकाशनावेळी काय म्हणाले रवींद्र चव्हाण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या १२ वर्षांत आत्मनिर्भरता, आर्थिक प्रगती आणि जागतिक स्तरावर मजबूत स्थान निर्माण केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 26, 2026 | 06:15 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या बारा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आत्मनिर्भरता, आर्थिक प्रगती आणि जागतिक स्तरावर मजबूत ओळख निर्माण करत विकासाच्या नव्या उंची गाठल्या आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मुंबईतील प्रभादेवी येथे रविंद्र नाट्यमंदिरात आयोजित “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती” या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कुटे, आमदार सुनील राणे आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम उपस्थित होते.

Vidhan parishad Election 2026: निवडणुकीची रणधुमाळी सुरू! दोन दिवसांत १८ अर्जांची विक्री, मात्र अधिकृत अर्ज अद्याप शून्य

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “Make in India” आणि “Make for  world” यांसारख्या उपक्रमांमुळे भारताने उत्पादन, उद्योग आणि आत्मनिर्भरतेच्या क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे. एकेकाळी मदतीची अपेक्षा असलेला देश म्हणून पाहिल्या जाणाऱ्या भारताने आज जागतिक पातळीवर प्रभावी राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आला. उज्ज्वला योजना, घराघरात शौचालय उभारणी आणि गरीब कल्याणाशी संबंधित उपक्रमांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल झाल्याचे त्यांनी सांगितले.

देशाच्या आर्थिक वाढीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, २०१३-१४ मध्ये भारताचा जीडीपी १०३ लाख कोटी रुपये होता, तो २०२५-२६ मध्ये ३५७ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्राचाही जीडीपी १३ लाख कोटींवरून ५४ लाख कोटींवर गेला असल्याचे त्यांनी नमूद केले. ही वाढ केवळ घोषणांमुळे नव्हे, तर दीर्घकालीन नियोजन, धोरणात्मक निर्णय आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

” हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार…” पुणे जमावबंदी निर्णयावरून सुप्रिया सुळेंचा सवाल

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या मते, भारताने या काळात आर्थिक, डिजिटल, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन अनुभवले आहे. महिलांचे सक्षमीकरण, युवकांना संधी आणि गरीबांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रभावी काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती” या विशेष संग्राह्य अंकामध्ये अखंड भारत, अंत्योदय, सुरक्षित भारत, युवा शक्ती, मातृप्रधान भारत, विज्ञान, उद्योग तसेच विकसित भारत २०४७ या विविध महत्त्वपूर्ण विषयांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. याशिवाय जागतिक स्तरावर भारताने निर्माण केलेला प्रभाव, सीमांवरील ठाम भूमिका आणि मानवतेच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या भारताचे विविध पैलू या अंकात मांडण्यात आले आहेत.

मोदींनी स्वतःला राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले असून ते खऱ्या अर्थाने “राष्ट्र तपस्वी” असल्याचे गौरवोद्गार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी काढले. “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती” हा अंक नव्या भारताच्या परिवर्तनाचा महत्त्वपूर्ण दस्तावेज ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: What did ravindra chavan say at the launch of the publication rashtra nirmanachi tapapurti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Minister Ravindra Chavan
  • Ravindra Chavan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.