पुणे जमाबंदी निर्णयावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
पुणे शहर पोलिसांनी यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून आज (26 मे) रात्रीपासून पुण्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने परिपत्रक जारी केले असून पुढील १५ दिवस हा जमावबंदीचा आदेश लागू असणार आहे. या जमावबंदीच्या काळात पाच जणांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याशिवाय जमावबंदीच्या काळात आंदोलने मोर्चे आणि सभांनाही बंदी घालण्यात आले आहे. या निर्णयावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले असून “हे करून पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहत आहेत?” असा सवाल उपस्थित केला आहे.
पुणे शहर पोलिसांनी यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाने आज रात्रीपासून, म्हणजेच २६ मे २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. हे आदेश ८ जून २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत.यावरून सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ हॅण्डलवरून पोस्ट करत प्रश्न उपस्थित केले आहेत.
आपल्या पोस्टमधून त्या म्हणाल्या, “पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले आहे. या शहरात हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय ?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले… — Supriya Sule (@supriya_sule) May 26, 2026
पुढे त्या म्हणाल्या, “एकतर पुण्यातली वाढती गुन्हेगारी थांबविण्यात पोलीसांना अद्याप किंचितही यश आलेले नाही. शहरात गुन्हेगारी सतत वाढत असून महिलांना, बालकांना सुरक्षित वातावरण पोलीस देऊ शकत नाहीत. कोयता गँग रोज नव्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे.गोळीबाराच्या, लूटमारीच्या, दहशत माजविल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अशा परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करुन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहत आहेत ?”
“पोलीस आयुक्त, जमाबंदी नाही प्रतिबंधात्मक आदेश असं म्हणत आहेत. जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्वाचे म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे ? हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार आहे,” अश्या शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.






