Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मीरा-भाईंदर शहराचा पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार कधी?

मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. पाणी कपातीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून या पाणीपुरवठ्यात देखील कपात करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शहराला केवळ सरासरी १९० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यात दोन ते तीन दिवसाआड जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी हा पुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवला जात आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 27, 2024 | 02:14 PM
मीरा-भाईंदर शहराचा पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार कधी?
Follow Us
Close
Follow Us:

मीरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यातून महिनाभरापासून मंजुर कोट्यापेक्षा कमी पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय दोन दिवसाआड जलवाहिनी दुरुस्तीच्या कामानिमित्त हा पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. परिणामी शहरात पाण्याची टंचाई जाणवत आहे. यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. मिरा-भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणकडून ८६ दक्षलक्ष लिटर तर एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष लिटर असा एकूण २२१ दक्षलक्ष लिटर पाणीपुरवठा मंजुर आहे. मात्र प्रत्यक्षात पाणीगळती आणि इतर कारणांमुळे यातील जवळपास 200 दक्षलक्ष लिटर इतकाच पाणीपुरवठा होतो.

परंतु गेल्या महिनाभरापासून या पाणीपुरवठ्यात देखील कपात करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शहराला केवळ सरासरी १९० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यात दोन ते तीन दिवसाआड जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी हा पुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येतो. परिणामी शहरातील जुन्या भागात तसेच दाट लोकवस्ती असलेल्या गृह संकुलात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. यामुळे नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहत आहेत. तर बऱ्याच वेळा टँकर चालकांकडे देखील पाणी नसल्याने कोरडाच दिवस काढावा याबाबत आपल्या मिराभाईंदर शहरातील प्रतिनिधी विजय काते यांनी आपला दैनिक वृत्तपत्रांमध्ये याबाबत बातमी ही लावली होती. त्याच अनुषंगाने शहरात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईबाबत पालिकेत काही दिवसापूर्वी काँग्रेसनेही आंदोलन केले होते. तसेच आज मनसेमार्फत हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यासंपूर्ण विषयाबाबत मिरा-भाईंदज शहरातील राजकीय पुढार्‍यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊ.

तसेच या बाबतीमध्ये मीरा-भाईंदर शहरातील पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांना विचारणा केली असता त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. सर्व राजकीय पक्षाकडून मीरा-भाईंद शहरांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल आक्रमक भूमिका आहे पाणीपुरवठ्यावरती मीरा-भाईंदर महानगरपालिकेने लवकरच तोडगा काढावा त्याने मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांचे हाल होणार नाही.

पाणीकपातीमुळे नागरिक संतापले

मीरा भाईंदरमध्ये असलेल्या जुन्या वसाहतीमध्ये दिवसेंदिवस नागरिकांच्या घरांमध्ये वाढ होत चालली आहे. मोठ्या प्रमाणात पाणी कपात होत असल्यामुळे टँकरची मदत घ्यावी लागत आहे. त्याचबरोबर टँकर चालकाकडे पाणी नसल्यामुळे संपूर्ण दिवस कोरडा काढावा लागत आहे.

Web Title: When will the water shortage problem of mira bhyander city be solved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 02:14 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mira Bhyander
  • Water Shortage

संबंधित बातम्या

अवैध खनिज उत्खननावर कडक कारवाई; तीन महिन्यांत सर्वेक्षण करुन दोषींवर कारवाई करणार – चंद्रशेखर बावनकुळे
1

अवैध खनिज उत्खननावर कडक कारवाई; तीन महिन्यांत सर्वेक्षण करुन दोषींवर कारवाई करणार – चंद्रशेखर बावनकुळे

सातारा पोलिसांच्या निलंबनाला मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोध, विधान परिषदेत शंभूराजे देसाई आणि जयकुमार आमने सामने
2

सातारा पोलिसांच्या निलंबनाला मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोध, विधान परिषदेत शंभूराजे देसाई आणि जयकुमार आमने सामने

Satara News: सातारा पालिकेच्या रोखल्या घंटागाड्या, सोनगाव ग्रामस्थ आक्रमक, धुराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची केली मागणी
3

Satara News: सातारा पालिकेच्या रोखल्या घंटागाड्या, सोनगाव ग्रामस्थ आक्रमक, धुराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची केली मागणी

भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेला होणार मतदान
4

भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेला होणार मतदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.