Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान; पुणे-कोल्हापूर मार्गालाही तडाखा

पुणे-कोल्हापूर महामार्गासह आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. डिंभे धरण परिसरात दुपारनंतर वातावरणात गारवा निर्माण होत पावसाला सुरुवात झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 19, 2026 | 04:22 PM
अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान; पुणे-कोल्हापूर मार्गालाही तडाखा

अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान; पुणे-कोल्हापूर मार्गालाही तडाखा

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात बुधवारी गारपीटासह अवकाळी सरी बरसल्या. त्यामुळे ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव परिसरात ऐन कापणीच्या तोंडाशी आलेले पीक आडवे पडल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गुरुवारी गुढी पाडव्याच्या सणाआधीच शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या अपेक्षेने घेतलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीचा आढावा स्थानिक पातळीवर घेतला जात असून, मदतीची मागणी होत आहे.

विधानभवन येथे धाराशिवचे आमदार कैलास पाटील व उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार प्रविण स्वामी यांनी बुधवारी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. त्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटीमुळे झालेल्या शेती नुकसानाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. पुणे-कोल्हापूर महामार्गासह आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. डिंभे धरण परिसरात दुपारनंतर वातावरणात गारवा निर्माण होत पावसाला सुरुवात झाली. मागील दोन दिवसांपासून उकाडा वाढला होता. सध्या हलक्या सरी कोसळत असल्या तरी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे विशेषतः आदिवासी भागातील शेतकरी चिंतेत असून, पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कर्जमुक्तीच्या घोषणेनंतरही वसुलीचा तगादा! पुसद, महागावमध्ये कर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीस

धाराशिवमध्ये द्राक्ष, केळी, आंब्याचे नुकसान

मंगळवारी धाराशिव-उमरगा-लोहारा मतदारसंघात दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. द्राक्ष, केळी, आंबा तसेच विविध फळबागांसह कांदा, हरभरा, गहू, ज्वारी यांसारख्या पिकांचे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. विशेषतः गारपीटीमुळे अनेक ठिकाणी उभी पिके जमिनीवर आडवी पडली असून, हातातोंडाशी आलेले पीक पूर्णतः नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीची सरकारकडून दखल

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वीच नुकसानभरपाईची अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी आढावा बैठकीत सांगितले.

हेदेखील वाचा : Kolhapur News : इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका; कोल्हापुरात गॅस दरवाढीमुळे रिक्षाचालकांना संताप

Web Title: Widespread damage to agricultural crops due to unseasonal rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Agricultural Crops
  • Kailas Patil
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

बोगस बियाणेप्रकरणी एसआयटी गठित! शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निर्णायक पाऊल; नुकसानीची होणार आता सखोल चौकशी
1

बोगस बियाणेप्रकरणी एसआयटी गठित! शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निर्णायक पाऊल; नुकसानीची होणार आता सखोल चौकशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.