कापूस पिकांवर कीड लागण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आवश्यक सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन करावे अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी टाळावी असे आव्हान करण्यात आले आहे.
शेतामध्ये चुकीच्या पद्धतीने कीटनाशकांची फवारणी केल्यामुळे अनेकांना विषबाधा झाल्याचे दिसून आले आहे. शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी करताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्यास गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
कर्जमुक्तीचा लाभ मिळाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. कर्जमाफीमुळे जुन्या थकबाकीचे ओझे कमी झाले.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. अनेक भागांमध्ये बियाण्यांची अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा आर्थिक फटका सहन करावा लागला. या प्रकाराविरोधात शेतकऱ्यांनी…
ग्रामीण भागातील नेटवर्कची समस्या, स्मार्टफोन हाताळण्यातील अडचणी आणि तांत्रिक माहितीचा अभाव यांमुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या पिकाची पीक पाहणी नोंदणी वेळेत करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे अनेकदा शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित…
निसर्गाचे आणि मृग नक्षत्राचे पाणी जोपर्यंत पेरणीसाठी पडत नाही, तोपर्यंत शेतकरी पेरणी करणार नाही, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.पाऊस येण्याचे चिन्हे दिसताच आणि आकाशात आभाळ पाहून शेतकरीराजा सुखावल्याचे पाहावयास…
बदलत्या हवामानाचा सामना करत शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहे. गत काही वर्षांपासून अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांमुळे शेती उत्पादनात मोठी घट झाली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून शेतातच सुकण्यासाठी ठेवलेले गहू व हरभऱ्याचे ढिग पूर्णपणे भिजल्याने त्यांची गुणवत्ता घसरली आहे. ओलसर झालेल्या धान्याला अंकुर फुटण्याचा धोका निर्माण झाला असून बाजारात दर घसरण्याची शक्यता…
रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस व गारपीट झाली.
पुणे-कोल्हापूर महामार्गासह आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. डिंभे धरण परिसरात दुपारनंतर वातावरणात गारवा निर्माण होत पावसाला सुरुवात झाली.