मागच्या चार दिवसांपासून पुण्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी गारांसह पाऊस कोसळल्यानंतर आज पुण्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे.
अवकाळी पावसामुळे ५५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ३० हजारांहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. पावसामुळे हाताशी आलेली पिके मातीमोल झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू असून आहे. मजुरांची टंचाई असल्यामुळे शेतकरी जास्त मजुरी देऊन कामे करून घेत आहेत. अशातच वातावरणात अचानक बदल होऊन ढग दाटून आले.
अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे पर्यटकांच्या हालचालींवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामानातील या अनपेक्षित बदलामुळे पुढील काही दिवसांतही पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
हवामान विभागाने २३ ते २६ मार्च दरम्यान उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळांचा इशारा दिला आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ताशी ४० किलोमीटर वेगाचे वारे वाहू शकतात.
मनमाड परिसरात दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होत असल्याने काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी पहाटेपासून गहू काढणीच्या कामाला लागले असून, पावसाचे संकट उभे राहिले आहे.
रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस व गारपीट झाली.
पुणे-कोल्हापूर महामार्गासह आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. डिंभे धरण परिसरात दुपारनंतर वातावरणात गारवा निर्माण होत पावसाला सुरुवात झाली.
गेल्या आठवडाभरापासून उन्हाच्या चटक्याने आणि वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना शनिवारी पहिल्याच अवकाळी पावसाने थोडासा का होईना दिलासा दिला.
हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. अवकाळी पावसामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच मिळणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून देण्यात आली आहे.
अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आठवडाभर संततधार पडलेल्या पावसामुळे घरांची पडझड झाली होती. तालुक्यात उन्हाळी भुईमूग, मका, ज्वारी, हायब्रीड, भाजीपाला व आंबा पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.
महाविकास आघाडीचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अनिल देशमुखयाणी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. सध्या राज्यात दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत.
अद्याप सातारा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झालेले नाही तरीसुद्धा येणारा पाऊस तुर्त अवकाळीच म्हणावा लागणार आहे. बळीराजाला शेतीच्या कामाची उसंत पावसामुळे मिळेनाशी झाली आहे.