Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केबलचे कनेक्शन जोडत असतानाच बसला विजेचा जोरदार झटका; तरुणाचा जागीच मृत्यू

अतुल कदम याला पुलाची शिरोली येथील खाजगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर येथे नेण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 07, 2025 | 03:01 PM
केबलचे कनेक्शन जोडत असतानाच बसला विजेचा जोरदार झटका; जागीच झाला मृत्यू

केबलचे कनेक्शन जोडत असतानाच बसला विजेचा जोरदार झटका; जागीच झाला मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

शिरोली : नागाव (ता.हातकणंगले) येथे केबलचे कनेक्शन जोडत असताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.6) सकाळी अकराच्या सुमारास घडली. अतुल तानाजी कदम (वय ३०, रा. माळवाडी, नागाव) असे तरुणाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अतुल कदम हा एका चॅनेलच्या केबल कनेक्शनची कामे करत शिरोली औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामाला होता. शुक्रवारी सकाळी नागाव येथील एका मेडिकलच्या गोडावूनजवळ बांधकाम सुरू आहे, त्याठिकाणी केबल कनेक्शन काढून दुसरीकडे बदलत असताना त्या इमारतीवरून जाणाऱ्या 11 केव्हीच्या फीडरच्या विद्युत तारेला चॅनलच्या केबलचा स्पर्श झाला. त्यामुळे अतुल कदम या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.

हेदेखील वाचा : पोर्शे अपघात प्रकरणात सरकारी वकिलांची मोठी माहिती; अजय तावरेनेच ‘तो’ कट रचल्याचे पुरावे…

अतुल कदम याला पुलाची शिरोली येथील खाजगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर येथे नेण्यात आला. या होतकरू मुलाचा आकस्मित मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

अतुल होता अविवाहित

अतुल कदम हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. दोन वर्षांपासून नागाव ग्रामपंचायतीने इमारतीवरील फीडरची केबल हलवण्यासाठी महावितरणशी पत्रव्यवहार केला होता. महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे हा मृत्यू झाल्याने महावितरण विरोधात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

हेदेखील वाचा : सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यूॉ

तीन वर्षीय चिमुकलीचाही मृत्यू

दुसऱ्या एका घटनेत, शिरोली येथे घरात खेळणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या मुलीला कूलरमधून विजेचा जोरदार झटका लागला. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना झमकोली (ता. भिवापूर) येथे शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. उन्नती अर्जुन बोटरे (वय ३) असे बालिकेचे नाव असून, या घटनेने संपूर्ण गाव हळहळून गेले आहे.

Web Title: Youth dies due to electric shock incident shiroli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • Electric Shock
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
2

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
4

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.