
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“बिग बॉस १९” च्या वीकेंड का वार या रिॲलिटी शोमध्ये अनपेक्षित गोष्ट उघड झाली. निर्मात्यांनी प्रणीत मोरे एक मोठा निर्णय घेण्यास सांगितले, जो तीन नामांकित स्पर्धकांपैकी एकाला वाचवू शकला. त्याने अशनूर कौरचे नाव घेतले. अभिषेक बजाज आणि नीलम गिरी यांना बाहेर काढण्यात आले. यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. चाहते अभिषेकच्या समर्थनार्थ बाहेर आले आणि निर्मात्यांवर संताप व्यक्त केला आहे. तसेच आता अभिषेक बाहेर पडल्यामुळे चाहते संपताप झाला आहे.
या आठवड्यात, “बिग बॉस १९” मध्ये पाच स्पर्धकांना बाहेर काढण्यासाठी नामांकन देण्यात आले. यामध्ये गौरव खन्ना, फरहाना भट्ट, अशनूर कौर, अभिषेक बजाज आणि नीलम गिरी यांचा समावेश होता. होस्ट सलमान खानने जाहीर केले की फरहाना आणि गौरव सुरक्षित आहेत. यामुळे अशनूर, अभिषेक आणि नीलम हे शेवटच्या तीनमध्ये राहिले होते.
The guy who wanted to stay till the end and wanted to lift the trophy. It’s truly sad and unfair💔 Stay strong @Humarabajaj6
We all loved watching ur game and thanks for the 2months of absolute entertainment💖 UNBEATABLE ABHISHEK BAJAJ#AbhishekBajaj
pic.twitter.com/OZbYiTc0ce — Ruby⁷³ (@rubybts073) November 9, 2025
प्रणीतने अशनूर कौरला केले सेफ
सलमान खानने नंतर सांगितले की प्रणित मोरेला एका स्पर्धकाला वाचवण्याचा अधिकार आहे. तो गेल्या आठवड्यात कर्णधार होता आणि वैद्यकीय कारणांमुळे घराबाहेर होता. पण आता तो विशेषाधिकार वापरू शकतो. प्रणीत पुढे म्हणाले की त्याचा निर्णय धक्कादायक असू शकतो. त्यानंतर त्याने अशनूर कौरला वाचवण्यासाठी नाव दिले, म्हणजेच अभिषेक आणि नीलमला घराबाहेर काढले गेले.
चाहते संतापले
यानंतर चाहते प्रणित मोरे आणि ‘बिग बॉस’च्या मेकर्सवर संतापलेले दिसले. अभिषेकचे नाव ट्विटरवर ट्रेंड होत आहे. चाहते त्याला पाठिंबा देत आहेत. ते म्हणतात की हा अन्याय्य आणि चुकीचे आहे. अभिषेकने दोन महिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि तो या ट्रॉफीसाठी पात्र आहे. प्रेक्षक प्रणित मोरेवर टीका करताना दिसत आहेत. ते म्हणाले की प्रणितने त्याला फसवले आहे आणि विश्वासघात केला आहे. त्याने मित्र असल्याचे भासवले आणि स्वतःच्या मित्राच्या पाठीत वार केला.